AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : करा हे सोपे उपाय, कर्जापासून मिळेल मुक्ती, वास्तुशास्त्र काय सांगतं?

घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्यावर अनेक संकट येऊ शकतात, आर्थिक संकट निर्माण होणं, कर्जबाजारीपण अशा समस्या निर्माण होऊ शकतात, हे दोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips : करा हे सोपे उपाय, कर्जापासून मिळेल मुक्ती, वास्तुशास्त्र काय सांगतं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2025 | 1:22 PM
Share

सगळं सुरळीत सुरू असताना अचानक एखाद्या व्यक्तीवर मोठं आर्थिक संकट येतं, प्रचंड प्रमाणात धनहानी होते, त्यामुळे व्यक्ती कर्जबाजारी होतो. अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे काही सूचत नाही. कितीही पैसा कमावला तर तो हातात टिकत नाही. अशा अनेक समस्या तुमच्या घरात असलेल्या वास्तुदोषामुळे निर्माण होऊ शकतात. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी हेच सांगितलं जात नाही, तर तुमच्या घरात असलेल्या वस्तूंची योग्य दिशा कोणती असावी, जर दिशा चूकत असेल तर तुमच्या आयुष्यात काय अडचणी येऊ शकतात? याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जातं. दरम्यान वास्तुशास्त्रात काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्हाला कर्जपासून मुक्ती मिळू शकते, नेमके काय आहेत उपाय आणि वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे? जाणून घेऊयात.

घराच्या उत्तर दिशेला स्वच्छता ठेवा – वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा ही तुमच्या धन आणि संपत्तीशी जोडलेली असते, त्यामुळे घराची उत्तर दिशा स्वच्छ असेल, तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहातो. तुम्हाला कधीच पैशांची कमी भासत नाही. तुम्हाला कर्जापासून सुटका मिळते.

तुळस – हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस ही विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. ज्यामुळे ज्या घरात तुळस आहे, त्या घरावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहातो. तिजोरी पैशांनी भरलेली राहाते. कर्जातून सुटका मिळते.

घरातील मुख्य दरवाजावर स्वस्तिक – तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह असावं, यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात नेहमी सकारात्म ऊर्जा प्रवाहित होते. यामुळे तुमच्या अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वीच नष्ट होतात.

तिजोरीचं स्थान – तुमच्या घरात असलेल्या तिजोरीचं स्थान हे योग्य असणं महत्त्वाचं असतं, ज्यामुळे तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील तिजोरी ही नेहमी दक्षिण -पश्चिम दिशेला असावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....