AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपंचमीला नागाला दूध का पाजतात? यामागे हे आहे शास्त्र!

वैज्ञानिकदृष्ट्या नागाला दूध देणे चुकीचे मानले जाते. यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत.

नागपंचमीला नागाला दूध का पाजतात? यामागे हे आहे शास्त्र!
या दिवशी साजरा केला जाईल नागपंचमीचा सण
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : सनातन धर्मात नागाला पूजनीय मानले जाते. महादेव गळ्यात नाग धारण करतात, तर दुसरीकडे भगवान विष्णू फक्त शेषनागावरच झोपतात. म्हणून हिंदू धर्मात नागपंचमीचा दिवस नागांच्या पूजेला समर्पित आहे. नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून त्यांना दूध पाजण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतात आणि तो त्या कुटुंबाला कधीही हानी पोहोचवत नाही. यंदा नागपंचमी 13 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध का दिले जाते, ते आपण याठिकाणी जाणून घेऊया. (Why do you give milk to Nag on Panchami, know the scripture behind it)

ही आहे आख्यायिका

नागराजाला दूध प्यायला देण्याच्या परंपरेचा संबंध पांडवांचे वंशज आणि कलियुगाचा पहिला राजा परीक्षित यांच्या कथेशी जोडला जातो. तक्षक सापाच्या दंशाने राजा परीक्षितचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर परीक्षितचा मुलगा जन्मेजयने हा संकल्प केला होता की तो पृथ्वीवरील सर्व सापांना संपवून टाकेल. त्यासाठी त्याने एका यज्ञाचे आयोजन केले. यज्ञाच्या प्रभावामुळे जगातील सर्व साप यज्ञकुंडात येऊन पडू लागले.

भयभीत होऊन तक्षक नाग आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या सिंहासनावर जाऊन लपला. यादरम्यान यज्ञाच्या प्रभावामुळे इंद्राचे सिंहासन हवनकुंडाच्या दिशेने ओढले जाऊ लागले. यावेळी ऋषींनी आणि देवतांनी राजा जन्मजेयाला विनंती केली की जर त्याने जगभरातील सर्व सापांना मारले तर निसर्गाचा समतोल बिघडून जाईल. राजा जन्मेजयने देवांची विनंती मान्य केली आणि तक्षकाला क्षमा केली. यानंतर यज्ञ कुंडात जळलेल्या नागांना बरे करण्यासाठी आस्तिक मुनींनी त्या नागांना गाईच्या दुधाने आंघोळ घातली. यामुळे नागांचा मत्सर शांत झाला.

दूध देण्याची परंपरा

ज्या दिवशी आस्तिक मुनींनी सापांना गायीच्या दुधाने आंघोळ केली, तो दिवस श्रावण महिन्याची पंचमी होता. तेव्हापासून श्रावण महिन्याच्या पंचमीचा दिवस सापांना समर्पित करण्यात आला. यासोबतच नागाला दुधाने आंघोळ करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी नागाची पूजा करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला जातो. शास्त्रातसुद्धा नागाला दुधाने आंघोळ करण्याचे सांगितले गेले आहे, पण आंघोळ करण्याऐवजी लोकांनी नागांनी दूध देण्याची परंपरा सुरू केली.

नागाला दूध पाजणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे

वैज्ञानिकदृष्ट्या नागाला दूध देणे चुकीचे मानले जाते. यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत. दूध प्यायल्याने त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन होते आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

अशी पूजा करा

नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी शेणापासून नाग बनवा किंवा पीठ वा मातीपासून नाग बनवा. धूप, दिवा, कच्चे दूध इत्यादींनी नागदेवतेची पूजा करा. नागांना गहू, भाजलेले हरभरा आणि खीर यांचा प्रसाद अर्पण करा. यानंतर उर्वरित प्रसादाचे लोकांना वाटप करा. (Why do you give milk to Nag on Panchami, know the scripture behind it)

इतर बातम्या

प्रवासी रिक्षात बसला, चालकानेच निर्जनस्थळी मोबाईल-पैसे हिसकावले, थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कसं पकडलं?

Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.