AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup Final : भारताकडून 2 वेळा मार खाऊनही पाकडे सुधरेना, बांगलादेशला हरवल्यावर सलमान मिरवतोय शेखी

आशिया कपच्या सुपर-4मध्ये बांगलादेशला नमवून पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता, येत्या रविवारी 28 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा पुन्हा सामना होणार असून त्यामध्ये कोण बाजी मारतं याकडेच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र बांगलादेशला हरवल्यावर पाकिस्तानच्या कर्णधाराने थेट चॅलेंज दिलं आहे.

Asia Cup Final : भारताकडून 2 वेळा मार खाऊनही पाकडे सुधरेना, बांगलादेशला हरवल्यावर सलमान मिरवतोय शेखी
पाकिस्तानची आशिया कपच्या फायनलमध्ये धडक
| Updated on: Sep 26, 2025 | 9:49 AM
Share

दुबईमध्ये रंगलेल्या आशिया कप 2025 च्या सुमपर -4 सामन्यात बांगलादेशला 11 धावांनी हरवून पाकिस्तानी टीमने फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. या रोमांचक लढतीनंतर रविवारी पाकिस्तानी संघ भारताशी लढणार असून आशिया कपच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असून, जीवतोड मेहनत करतील यात शंकाच नाही. हा हाय व्होल्टेज ड्रामा, ती लढत पाहण्यासाठी क्रिकेट चाहतेही तितकेच उत्सुक असून सर्वांनाच रविवारची प्रतीक्षा आहे.

दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचल्यामुळे पाकिस्तानी संघाचा उत्साह एकदम शिगेला पोहोचला असून, त्याच उत्साहात त्यांनी थेट भारतालाच चॅलेंज देऊन टाकलं आहे. आमची टीम कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला हरवू शकते, अगदी भारतालाही आम्ही लोळवू शकतो, असं मोठ विधान पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगाने केलं आहे. मात्र याच आशिया कप स्पर्धेत भारताने दोन वेळा आपल्याला हरवलं आहे, गेल्या दोन सामन्यात आपला दारूण पराभव झाल्याचा पाकिस्तानच्या कर्णधाराला सोयीस्कररित्या विसर पडला आहे. त्यामुळे फायनलबद्दल पाक कर्णधाराच्या या वल्गना ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रविवारी रंगणार भारत वि. पाकिस्तान फायनल

भारताने आधीच आशिया कपची अंतिम फेरी गाठली आहे तर काल बांगलादेशला हरवून पाकिस्तानेनही फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे रविवारी, 28 सप्टेंबर रोजी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना निश्चित आहे. यामुळे पाकिस्तान आणि भारत 2025 च्या आशिया कपच्या जेतेपदासाठी, या स्पर्धेत तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील.

बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानी कर्णधाराने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. सामन्यानंतर कॅप्टन सलमान म्हणाला, “जर तुम्ही अशा प्रकारे सामने जिंकलात तर याचा अर्थ तुम्ही एक खास संघ आहात. सर्वांनीच उत्तम कामगिरी केली. आमच्या फलंदाजीत काही सुधारणा आवश्यक आहे, पण आम्ही त्यावर काम करू.” असं त्याने नमूद केलं.

पाकिस्तानने सुपर-4मध्ये बांगलादेशसमोर 135 धावांचे टार्गेट ठेवले होते. पण त्यांनी बांगलादेशच्या खेळाडूंना 124 धावांवरच रोखले आणि 11 धावांनी विजय मिळवला. गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि संघाचा विजयाचा मार्ग सुकर केला. विजयानंतर सलमान आगा पुढे म्हणाला – ” आम्हाला काय करायचं आहे ते नीट माहीत आहे. आमची टीम कोणालाही हरवू शकते. रविवारी आम्ही मैदानात उतरू आणि भारतीय संघालाही हरवायचा प्रयत्न करू” असा विश्वास त्याने व्यक्त केला.

शाहीन शाह आफ्रीद ठरला PAK vs BAN सुपर-4 मॅचचा हिरो

काल झालेल्या पाक वि. बांगलादेशच्या सामन्यात शाहीन शाह आफरीदी हिरो ठरला. त्याने शानदार फलंदाजी तर केलीच पण भेदक गोलंदाजीही केली. सामनावीर शाहीनने 13 चेंडूत 19 धावा केल्या आणि नंतर गोलंदाजी करत 3 बळी घेत बांगलादेशची फलंदाजी उद्ध्वस्त केली. शाहीन म्हणाला, “जेव्हा लक्ष्य लहान असते तेव्हा सुरुवातीच्या विकेट्स महत्त्वाच्या असतात आणि आम्ही हेच नियोजन केले होते. पॉवरप्लेमधील तीन षटकांच्या प्रभावामुळे फरक पडला. बांगलादेशने पहिल्या ३१ चेंडूत २९ धावा केल्या आणि तीन विकेट्स गमावल्या.” असे तो म्हणाला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या