AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला
रवींद्र जाडेजाची दुखापत कांगारुंच्या पथ्यावर
| Updated on: Jan 11, 2021 | 2:33 PM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना (Aus vs Ind, 3rd Test) ड्रॉ झाला आहे. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334 धावा करता आल्या. दरम्यान टीम इंडियाला हा सामना जिंकण्याचीही संधी होती. मात्र निर्णायक क्षणी कांगारुंच्या गोलंदाजांनी सेट झालेल्या (Rishabh pant) रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाद केलं. परिणामी टीम इंडियाने सामना वाचवण्याच्या दृष्टीने ड्रॉच्या उद्देशाने खेळ केला. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाली. ही दुखापत टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. तर कांगांरुंना जाडेजाच्या दुखापतीचा फायदा झाला, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (aus vs ind 3rd test match at scg australia benefit from ravindra jadeja injury)

जाडेजाला पहिल्या डावात बॅटिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला नाबाद 28 धावांवर मैदानाबाहेर परतला. जाडेजाला चांगली सुरुवात मिळाली होती. जाडेजा फार विश्वासाने खेळत होता. मात्र दुखापतीमुळे त्याला बाहेर जावे लागले. जाडेजाला ही दुखापत झाली नसती तर जाडेजाने आणखी काही धावा केल्या असत्या. परिणामी कांगारुंना दुसऱ्या डावात आणखी कमी धावांची आघाडी मिळाली असती.

दुसऱ्या डावात गोलंदाजी नाही

जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचं निदान झालं. जाडेजाच्या अंगठ्याचं स्कॅन करण्यात आलं. स्कॅन रिपोर्टनुसार जाडेजाचा अंगठा फ्रॅक्चर झाला. परिणामी जाडेजाला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. जाडेजा आपली ओव्हर फार वेगाने पूर्ण करतो. जाडेजा दीड मिनिटांमध्ये आपली ओव्हर संपवतो. त्यामुळे जाडेजाच्या फिरकीत किमान 2 फलंदाज अडकतात. मात्र जाडेजा नसल्याने कांगारुंना सहजपणे फंलदाजी करता आली. यामुळे कांगारुंनी दुसऱ्या डावात सहजपणे 338 धावा केल्या.

….तर भारत जिंकला असता?

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला. भारताला विजयासाठी 309 धावांची आवश्यकता होती. पाचव्या दिवशी रहाणे झटपट बाद झाला. त्यानंतर पंत आणि पुजाराने 148 धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. मात्र पंत आणि पुजारा ही सेट जोडी बाद झाली. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीला ड्रॉच्या उद्देशाने खेळ करावा लागला.

जाडेजा फीट असता तर तो मैदानाच खेळायला आला असता. जाडेजा इंजेक्शन घेऊन खेळायला येणार असंही म्हटलं जात होतं. मात्र ही दुखापत जाडेजा आणि टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. जाडेज जर फीट असता, तर सामन्याचा निकाल नक्कीच टीम इंडियाच्या बाजूने असता, अशा प्रतिक्रिया टीम इंडियाच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहेत. मात्र दुखापतीअभावी जाडेजा खेळू शकला नाही. याचाच फायदा ऑस्ट्रेलियाला झाल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Ravindra Jadeja | टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

(aus vs ind 3rd test match at scg australia benefit from ravindra jadeja injury)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....