AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ban vs Pak 3rd T20I : बांग्लादेशसमोर पाकिस्तानची मोठ्या मुश्किलीने वाचली इज्जत

Ban vs Pak 3rd T20I : बांग्लादेशसमोर पाकिस्तानची मोठ्या मुश्किलीने इज्जत वाचली. अन्यथा मायदेशात अजून मानहानी वाट्याला आली असती. बांग्लादेशच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ मजबूत मानला जातो. पण पाकिस्तानी टीमला लौकीकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही.

Ban vs Pak 3rd T20I : बांग्लादेशसमोर पाकिस्तानची मोठ्या मुश्किलीने वाचली इज्जत
ban vs pak third t20i matchImage Credit source: Tanvin Tamim/DRIK/Getty Images
| Updated on: Jul 25, 2025 | 12:12 PM
Share

पाकिस्तानने तिसरा आणि शेवटचा T20I सामना जिंकून मोठ्या मुश्किलीने आपली इज्जत वाचवली. बांग्लादेश विरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने शानदार प्रदर्शन केलं. त्याच्या 74 धावांच्या बळावर पाकिस्तानने ही मॅच जिंकली. मात्र, तरीही बांग्लादेशच्या टीमने तीन T20I सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. पहिले दोन t20 सामने जिंकून बांग्लादेशने मालिका आधीच जिंकली होती. पाकिस्तानसाठी तिसरा सामना प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. अन्यथा त्यांच्या नावावर 3-0 अशा मानहानीकारक पराभवाची नोंद झाली असती. शेवटच्या सामन्यात पुनरागमन करत पाकिस्तानने बांग्लादेश विरुद्ध मोठ्या विजयाची नोंद केली. आधी ही मालिका 5 सामन्यांची होणार होती. पण नंतर सामने घटवून तीन सामन्यांची सीरीज खेळवण्यात आली.

पहिले दोन t20 सामने गमावल्यानंतर ढाका मीरपुरच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण बांग्लादेशची टीम 16.4 ओव्हर्समध्ये 104 धावांवर ऑलआऊट झाली. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानी टीमने 74 धावांनी विजय मिळवला.

क्लीनस्वीप करण्यात अपयश

या सीरीजमधील पहिला सामना बांग्लादेशने 7 विकेटने जिंकलेला. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 8 धावांनी हरवलं. पण ते सीरीजमध्ये क्लीनस्वीप करु शकले नाहीत. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने 41 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. या शानदार इनिंगसाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.

17 चेंडूत 33 धावांची वेगवान इनिंग

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानी टीमने चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 47 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ओपनर सॅम अयूब 21 धावा करुन आऊट झाला. काहीवेळाने साहिबजादा फरहान पॅवेलियनमध्ये परतला. मोहम्मद हॅरिस काही जास्त करु शकला नाही. केवळ 5 धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर हसन नवाजने टीमचा डाव संभाळला. 17 चेंडूत 33 धावांची वेगवान इनिंग तो खेळला.

बांग्लादेशची खूप खराब सुरुवात

मोहम्मद नवाजने 16 चेंडूत 27 रन्स केल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने 7 विकेटवर 178 धावा केल्या. बांग्लादेशकडून वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदने सर्वाधिक तीन विकेट काढल्या. नसुम अहमदला दोन विकेट मिळाल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या बांग्लादेशची खूप खराब सुरुवात झाली.

179 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बांग्लादेशने खूप खराब सुरुवात केली. त्यांचे पाच विकेट 25 धावांवरच पडले. त्यानंतर यजमान संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. त्यांची संपूर्ण टीम 16.4 ओव्हरमध्ये 104 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. बांग्लादेशकडून मोहम्मद सैफुद्दीनने सर्वाधिक 35 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलमान मिर्जा सर्वाधिक तीन विकेट काढल्या. फहीम अशरफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी दोन-दोन विकेट काढले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.