AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2024: आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?

Asia Cup T20 2024: टीम इंडिया आणि पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने असणार आहे. एसीसीने आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Asia Cup 2024: आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?
ind vs pak flag cricket
| Updated on: Jun 26, 2024 | 5:18 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. एकूण 4 संघांमध्ये 27 जूनपासून सेमी फायनलला सुरुवात होणार आहे. तर 29 जून रोजी महाअंतिम सामना पार पडणार आहे. त्याआधी आशियाई क्रिकेट परिषद अर्थात एसीसीने वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेचा 10 दिवस थरार रंगणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे 19 ते 28 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेला मिळाला आहे.

यजमान श्रीलंकेसह या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, यूएई, मलेशिया आणि थायलंड हे संघ या स्पर्धेत भिडणार आहेत. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ आहेत. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंडचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. त्यानंतर फायनल सामना होईल आणि आशिया किंग संघ मिळेल.

मौका मौका

दरम्यान वूमन्स आशिया कप स्पर्धेमुळे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ असलेले टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची साऱ्या क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते. हा बहुप्रतिक्षित सामना 19 जुलै रोजी होणार आहे. टीम इंडियाच हाच पहिला सामना असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया यूएई आणि नेपाळ विरुद्ध भिडणार आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता

विरुद्ध यूएई, दुपारी 2 वाजता

विरुद्ध नेपाळ, संध्याकाळी 7 वाजता

सेमी फायनल 26 जुलै

फायनल 28 जुलै

टीम इंडियाचे सामने कुठे होणार?

टीम इंडिया कुठे काय करतेय?

दरम्यान वूमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला वनडे सीरिजमध्ये 3-0 ने क्लिन स्वीप दिला. त्यानंतर आता 28 जून ते 1 जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. तर 5, 7 आणि 9 जुलै रोजी टी 20 मालिकेतील 3 सामने पार पडतील. त्यानंतर टीम इंडिया आशिया कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.