AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s Asia Cup : भारतीय संघाची जेतेपदाला गवसणी, अंतिम फेरीत बांगलादेशचा उडवला धुव्वा

वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसला. बांगलादेशला 46 धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.

Women’s Asia Cup : भारतीय संघाची जेतेपदाला गवसणी, अंतिम फेरीत बांगलादेशचा उडवला धुव्वा
Women’s Asia Cup : भारतीय संघाची जेतेपदाला गवसणी, अंतिम फेरीत बांगलादेशचा उडवला धुव्वाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 22, 2026 | 4:17 PM
Share

वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला 46 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताचे बाजूने लागला होता. कर्णधार राधा यादवने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 134 धावा केल्या. तसेच विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं. पण या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 19.1 षटकात 88 धावा करू शकला. भारताने 46 धावांनी विजय मिळवत जेतेपद खिशात घातलं आहे. या विजयासह एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्सचे जेतेपद कायम ठेवले.या सामन्यात भारताची सुरूवात फार काही चांगली झाली नाही. अवघ्या 44 धावांवर चार गडी तंबूत होते. पण मधल्या फळीत तेजल हसबनीस आणि राधा यादव यांनी डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी 69 धावांची भागादारी केली. या भागीदारीमुळे भारताला 134 धावांपर्यंत मजल मारता आली. तेजल हसबनीसने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने 34 चेंडूत 51 धावा केल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

भारताने विजयासाठी दिलेल्या 135 धावा करताना बांगलादेशचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाज 20च्या पुढे धावा करू शकला नाही. सहा फलंदाजांचा डाव तर एकेरी धावसंख्येवरच आटोपला. विकेटकीपर शमिमा सुल्तानाने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली. इशमा तनजीम 3, समिन सुल्ताना 18, सादिया अक्तर 10, लता मोंडल 1, फहिमा खातुन 14, फरजाना इस्मिन 6, शोरिफा खातुन 9, संजिदा अक्तर मेघला 5, फतेमा जहान सोनिया 1 अशा धावा करून बाद झाले. भारताकडून प्रेमा रावतने 4 षटकात 12 धावा देत 3 गडी बाद केले. तर सोनिया मेंदियाने 2, तनुजा कंवरने 2. साईमा ठाकोरने 1, मिन्नू रावतने 1 आणि राधा यादवने 1 विकेट काढली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश अ महिला (प्लेइंग इलेव्हन): इश्मा तंजीम, शमिमा सुलताना (विकेटकीपर), सरमीन सुलताना, फहिमा खातुन (कर्णधार), लता मोंडल, फरजाना इसमिन, शोरिफा खातुन, सादिया अक्टर, फातेमा जहाँ सोनिया, संजिदा अक्तर मेघला, फरीहा त्रिस्ना.

भारत अ महिला (प्लेइंग इलेव्हन): नंदिनी कश्यप, वृंदा दिनेश, तेजल हसबनीस, अनुष्का शर्मा, राधा यादव (कर्णदार), ममथा माडीवाला (डब्ल्यू), मिन्नू मणी, तनुजा कंवर, सोनिया मेंदिया, प्रेमा रावत, साइमा ठाकोर

राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.
शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली, त्यावर निर्णय घेऊ; राऊत स्पष्टच बोलले
शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली, त्यावर निर्णय घेऊ; राऊत स्पष्टच बोलले.
एकच चर्चा होती ताईंना दादांच्या जागी घेतलं पाहिजे! झिरवळ काय म्हणाले?
एकच चर्चा होती ताईंना दादांच्या जागी घेतलं पाहिजे! झिरवळ काय म्हणाले?.
अजितदादांच्या दुर्घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी गावाची गावबंद हाक
अजितदादांच्या दुर्घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी गावाची गावबंद हाक.