AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 स्पर्धेत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं होणार, नक्की काय?

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेची क्रिकेट चाहत्यांना कायम प्रतिक्षा असते. यंदा या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र यंदा या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना 2 खेळाडूंची उणीव भासणार आहे. जाणून घ्या.

Asia Cup 2025 स्पर्धेत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं होणार, नक्की काय?
Team India Asia Cup Winner 2023Image Credit source: Surjeet Yadav/Getty Images
| Updated on: Aug 07, 2025 | 1:10 AM
Share

बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा थरार 28 सप्टेंबरपर्यंत रगंणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघामध्ये मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या आशिया कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच यंदा या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 वर्षांनतर वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. यंदा या स्पर्धेत 2 दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील गतविजेता आहे.

आशिया कपमध्ये यंदा 21 वर्षानंतर पहिल्यांदाच 2 खेळाडूंची उणीव भासणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाचे हे 2 अनुभवी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. या दोन्ही खेळाडूंनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या दोघांची निवड करण्यात आली नाही. अशाप्रकारे या दोघांशिवाय 21 वर्षानंतर आशिया कप स्पर्धा होणार आहे. याआधी 2004 साली या दोघांशिवाय आशिया कप स्पर्धेचा थरार रंगला होता. मात्र तेव्हा या दोघांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं नव्हतं. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक आशिया कप स्पर्धेत विराट आणि रोहित सहभागी झाले होते.

तसेच त्यानंतर झालेल्या प्रत्येक आशिया कप स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांपैकी किमान कुणा एकाने तरी सहभाग घेतला होता. विराट आणि रोहित हे भारतीय संघाचे गेल्या 2 दशकांमधील आधारस्तंभ राहिले आहेत. या दोघांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत असंख्य वेळा भारताला एकहाती सामने जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. विराटने कर्णधार आणि फलंदाज म्हणून असंख्य विक्रम केले. मात्र विराट दुर्देवाने त्याच्या नेतृत्वात भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरला. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा याने भारताला टी 20i वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली.

तसेच रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 2018 साली आशिया कप जिंकून दिला होता. तसेच 2023 साली अखेरीस भारतानेच आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तेव्हा विराट कोहली आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात होता. मात्र आता या दोघांची क्रिकेट चाहत्यांना उणीव भासणार इतकं मात्र नक्की.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत