AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : चौथ्या कसोटीआधी टीम इंडियात या खेळाडूची अचानक एन्ट्री;2 सामन्यांसाठी संधी!

England vs India Test Series : लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 22 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता 23 जुलैपासून चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय संघात काही एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

ENG vs IND : चौथ्या कसोटीआधी टीम इंडियात या खेळाडूची अचानक एन्ट्री;2 सामन्यांसाठी संधी!
Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 20, 2025 | 5:52 PM
Share

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी चौथा सामना हा अतिशय अटीतटीचा पर्यायाने करो या मरो असा आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान आहे. त्याआधी टीम इंडियात 2 सामन्यांसाठी 24 वर्षीय युवा खेळाडूचा उर्वरित 2 सामन्यांसाठी समावेश करण्यात आला आहे. मात्र याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.

अंशुल कंबोज याचा उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला झालेल्या दुखापतीमुळे अंशुलला भारतीय संघात बॅकअप म्हणून संधी दिली गेली आहे. अर्शदीपला दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अर्शदीपला खोलवर जखम झाली आहे. त्यामुळे टाके मारण्यात आले आहेत. अर्शदीपला डॉक्टरांनी 10 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अर्शदीपच्या जागी अंशुलला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंशुलकडून इंग्लंडमध्ये 5 विकेट्स

अंशुल इंग्लंड दौऱ्यात इंडिया ए टीमचा भाग होता. अंशुलने जून महिन्यात 3 दिवसीय सामना खेळला होता. अंशुलने धारदार बॉलिंगने क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केलं होतं. अंशुलने 2 सामन्यांमध्ये 131 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच अंशुलने 2 सामन्यांमध्ये 76 धावाही केल्या होत्या. त्यामुळे अंशुलला भारताच्या मुख्य संघात संधी देण्यात यावी, अशा चर्चा सुरु होती. तेव्हा अंशुलला संधी मिळाली नाही. मात्र अखेर आता अंशुलचा समावेश करण्यात आला आहे.

अर्शदीप आणि आकाश दीपच्या खेळण्यावरुन अनिश्चितता

अर्शदीपला नेट्स प्रॅक्टीसदरम्यान साई सुदर्शने मारलेला फटका रोखताना दुखापत झाली. हाताला जास्त प्रमाणात मार लागल्याने अर्शदीपला चौथ्या कसोटी सामन्याला मुकावं लागू शकतं. तसेच आकाश दीप हा देखील खेळू शकणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. आकाशला ग्रोइन इंजरीमुळे मुकावं लागू शकतं.

जसप्रीत बुमराह खेळणार!

दरम्यान वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतील 5 पैकी 3 सामन्यांतच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. त्यामुळे बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की पाचव्या असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मात्र बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.