AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Super 4 : टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यापैकी कोण जिंकणार? साडे सात वाजता ठरणार!

India vs Pakistan Super 4 Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेत 14 सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. हा सामना कोण जिंकणार? जाणून घ्या अंदाज.

IND vs PAK Super 4 : टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यापैकी कोण जिंकणार? साडे सात वाजता ठरणार!
India vs Pakistan Asia Cup 2025Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 20, 2025 | 11:27 PM
Share

टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीला सुरुवात झाली आहे. सुपर 4 फेरीत 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असणार आहेत. सुपर 4 फेरीतील एकूण दुसऱ्या तर ए ग्रुपधील पहिल्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणार आहे. हा सामना रविवारी 21 सप्टेंबरला होणार आहे.  दोन्ही संघांची या स्पर्धेत एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. उभयसंघात 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने मात केली होती. भारताने या विजयासह सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. तर ओमानवर मात करत भारताने विजयी हॅटट्रिक लगावली होती. त्यामुळे भारताचा सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत करत विजयी चौकार लगावण्याचा प्रयत्न असणार आहे.

तर साखळी फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा भारतावर मात करत गेल्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीत कोणता संघ विजयाने सुरुवात करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र हा सामना कोणता संघ जिंकणार? हे सामना सुरु होण्याच्या 30 मिनिटांआधीच ठरणार आहे, ते कसं? हे जाणून घेऊयात.

दुबईत टॉस फॅक्टर महत्त्वाचा

उभयसंघातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. या मैदानात टॉस किती महत्त्वाचा आहे हे येथील आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.

दुबईतील आकडेवारी काय सांगते?

आतापर्यंत दुबईत एकूण 9 टी 20 सामन्यांमध्ये विजयी आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे रविवारी टॉस जिंकणारा संघ फिल्डिंग घेणार की बॅटिंग? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गेल्या सामन्यात काय झालं होतं?

दरम्यान या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ साखळी फेरीत आमनेसामने होते. उभयसंघात रविवारी 14 सप्टेंबरला सामना झाला होता. पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानला 127 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे भारताने 128 धावांचं आव्हान 7 विकेट्सआधी पूर्ण केलं होतं. भारताने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 131 रन्स करत विजय मिळवला होता.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता