AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : महारविवार, टीम इंडियाचे 14 सप्टेंबरला 2 सामने, एक पाकिस्तान विरुद्ध, दुसरा कुणासोबत?

Indian Cricket Team : मेन्स आणि वूमन्स क्रिकेट टीम इंडिया रविवारी 14 सप्टेंबरला एक्शन मोडमध्ये असणार आहेत. मेन्स टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. तर वूमन्स टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.

IND vs PAK : महारविवार, टीम इंडियाचे 14 सप्टेंबरला 2 सामने, एक पाकिस्तान विरुद्ध, दुसरा कुणासोबत?
Jasprit Bumrah Team IndiaImage Credit source: @OfficialAbhi04 X Account
| Updated on: Sep 11, 2025 | 6:56 PM
Share

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झालीय. या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. अफगाणिस्तानने सलामीच्या सामन्यात हाँगकाँगवर मात केली. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने यूएईवर विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात 11 स्प्टेंबरला बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याचे वेध लागले आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. मात्र यंदा क्रिकेट चाहत्यांना एकाच दिवशी क्रिकेटची डबल मेजवाणी असणार आहे.

रविवारी डबल धमाका

आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी 14 सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा 14 तारखेला आणखी एक सामना होणार आहे. मात्र हा सामना वूमन्स टीम इंडियाचा असणार आहे. अशाप्रकारे रविवारी क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचे 2 सामने पाहायला मिळणार आहेत.

दोन्ही सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेलाही 14 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. पहिला एकदिवसीय सामना हा मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघांचं नेतृत्व करणार आहे.

दोन्ही संघांसाठी निर्णायक मालिका

दरम्यान वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही संघांसाठी ही मालिका निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेकडे वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपमधील सर्व सामने कोलंबो आणि भारतातील 4 शहरांमध्ये होणार आहेत.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 सप्टेंबर, मुल्लानपूर

दुसरा सामना, 17 सप्टेंबर, मुल्लानपूर

तिसरा सामना, 20 सप्टेंबर, नवी दिल्ली

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.