AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup विजेत्याला इतक्या कोटींची लॉटरी! पराभूत टीम होणार मालामाल,भारत-पाक आज सामना

India Vs Pakistan Cricket Final Match 2025 : 9 सप्टेंबरपासून सुरू झालेला आशिया कप आज अंतिम टप्प्यात आला आहे. आज, रविवारी, 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा भिडतील. विजेत्या संघाला इतक्या कोटींचे बक्षीस मिळेल.

Asia Cup विजेत्याला इतक्या कोटींची लॉटरी! पराभूत टीम होणार मालामाल,भारत-पाक आज सामना
बक्षीसाची रक्कम किती
| Updated on: Sep 28, 2025 | 8:47 AM
Share

Asia Cup 2025 Prize Money : 9 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025 ची सुरुवात झाली. आज रविवारी, 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा भिडतील. दोन्ही देशात आज अंतिम सामना (Asia Cup Final) खेळला जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या खेळण्यावर क्रिकेट प्रेमी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच्या सामन्यांचा जल्लोष आणि उत्साह दिसून आलेला नाही. पहेलगाम हल्ल्यानंतर आशिया कपावर बहिष्कार टाकण्याची मागणी देशभरातून झाली. पण BCCI ने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी या सामन्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला इतक्या कोटींचे बक्षीस (Asia Cup 2025 Prize Money) मिळेल. तर पराभूत संघाला ही इनाम मिळेल.

आशिया कप 2025

सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी आशिया कपच्या बक्षीस रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला जवळपास 2.6 कोटी रुपयांचा इनाम मिळेल. तर उपविजेत्या, पराभूत संघाला जवळपास 1.30 कोटी रुपये मिळतील. आशिया क्रिकेट परिषदेने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ही आकडेवारी सूत्रांनी दिलेली आहे.

मागील आकडेवारीवर नजर टाकली असता ही रक्कम जवळपास दुप्पट असल्याचे दिसते. 2023 मधील आशिया कप जिंकल्यावर टीम इंडियाला जवळपास 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. याशिवाय प्लेअर ऑफ द सीरीज खेळाडूला 12.5 लाखांचा पुरस्कार मिळेल. सध्या अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव हे दोन्ही खेळाडू प्लेअर ऑफ द सीरीजच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.

विजेता संघ – 2.6 कोटी

उपविजेता संघ – 1.3 कोटी

प्लेअर ऑफ द सीरीज – 12.5 लाख

भारताने सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशानंतर श्रीलंकेला हरवले. गट अ मध्ये सुद्धा भारतीय संघाने विजय मिळवला. सुपर – 4 गुणतालिकेत टीम इंडियाचा दबदबा दिसून आला. आशिया चषकात 6 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर दोन सामने जिंकणारा पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका सर्वात खालच्या स्थानावर आहे. आशिया कप 1984 पासून सुरू झाला. 41 वर्षांत भारत आणि पाकिस्तान कधीच आशिया कपच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले नाही. यंदा मात्र दोन्ही संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.