AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, कांगारुंचा 48 धावांनी धुव्वा

Australia vs India 4th T20i Match Result : टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर होती. मात्र भारताने सांघिक खेळीच्या जोरावर सलग 2 सामने जिंकत मालिकेवर 1 हात ठेवला आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली.

AUS vs IND : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, कांगारुंचा 48 धावांनी धुव्वा
Axar Surya Shivam Tilak Team India vs Australia 4th T20IImage Credit source: Bcci
| Updated on: Nov 06, 2025 | 6:17 PM
Share

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी 20I सामन्यात 48 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियसमोर 168 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र कांगारुंना भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 18.2 ओव्हरमध्ये 119 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह या मालिकेतील एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे भारताची मालिका विजयाची संधी वाढली आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर पाचव्या आणि अंतिम सामन्यात मालिका बचावण्याचं आव्हान असणार आहे.

टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल

शुबमन गिल याच्या 46 आणि अभिषेक शर्माच्या 28 धावांच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 रन्स केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला मॅथ्यू शॉर्ट आणि कॅप्टन मिचेल मार्श या सलामी जोडीने 37 धावांची भागीदारी मिळवून दिली. अक्षर पटेल याने मॅथ्यू शॉर्ट याला 25 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला.

त्यानंतर मार्शने आणि जोश इंग्लिससह दुसऱ्या विकेटसाठी 30 रन्स जोडल्या. अक्षरने जोशला 12 रन्सवर बोल्ड करत कांगारुंना एकूण आणि सलग दुसरा झटका दिला. त्यानंतर भारताने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने झटके दिले. ऑस्ट्रेलियाला यातून सावरताच आलं नाही.ऑस्ट्रेलियासाठी मार्शने सर्वाधिक 30 धावा केल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला 20 पारही पोहचता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या 5 पैकी दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर दोघांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही.

भारताचे सर्व गोलंदाज यशस्वी

टीम इंडियासाठी फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक 6 तर वेगवागन गोलंदाजांनी 4 विकेट्स मिळवल्या. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाची बॅटिंग

टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 56 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर भारताने 64 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स गमावल्या. या दरम्यान शिवम दुबे याने 20 तर सूर्याने 22 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी अक्षर पटेल याने 21 धावांची निर्णायक खेळी केली. वॉशिंग्टन सुंदर याने 12 रन्स केल्या. मात्र इतर एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी एडम झॅम्पा आणि नॅथन एलीस या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या.

टीम इंडियाकडे हॅटट्रिकसह मालिका विजयाची संधी

दरम्यान इंडिया क्रिकेट टीमला आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी मालिकेच्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा असणार आहे. हा सामना शनिवारी 8 नोव्हेंबरला होणार आहे.

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..