AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : तिसरा सामना ड्रॉ झाल्यास भारताचं कसं असेल WTC Final समीकरण? जाणून घ्या

Team India Wtc Final Scenario If Draw 3rd Test Against Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. तर पुढील 3 दिवसही पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना अनिर्णित होण्याची दाट शक्यता आहे.

AUS vs IND : तिसरा सामना ड्रॉ झाल्यास भारताचं कसं असेल WTC Final समीकरण? जाणून घ्या
test team india squadImage Credit source: PTI
| Updated on: Dec 14, 2024 | 6:29 PM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्याच बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आहे. सामन्यातील पहिल्या दिवसाचा 90 टक्के खेळ हा पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवशी फक्त 13.2 ओव्हरचा गेम झाला. ऑस्ट्रेलियाने बिनबाद 28 धावा केल्या. टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाचे गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाहीत. तर पावसामुळे खेळ थांबला तोवर दोन्ही सलामीवीर नाबाद होते. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार निर्णायक आहे. ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी या मालिकेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. मात्र तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस वाया गेल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. इतकंच नाही, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवसावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची संधी आहे. अशात सामना जर अनिर्णित राहिला तर ते टीम इंडियासाठी चिंताजनक असणार आहे. सामना अनिर्णित राहिल्यास टीम इंडियाला पॉइंट्स टेबलमध्ये कोणतंच नुकसान होणार नाही. मात्र पीसीटी पॉइंट्समध्ये निश्चित बदल होईल.

कुणाला किती पॉइंट्स?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसर्‍या साखळीत सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना समसमान प्रत्येकी 4-4 गुण दिले दातात. त्यामुळे सामना अनिर्णित राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे पीसीटी पॉइंट्स हे 58.88 इतके होतील. तर टीम इंडियाचे पीसीटी पॉइंट्स हे 55.88 इतके होतील. त्यामुळे सामना अनिर्णित राहणं दोन्ही संघांसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे सामना निकाली निघावा, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.

टीम इंडिया तिसऱ्या स्थानी

दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीतील पॉइंट्स टेबलमध्ये तिसर्‍या स्थानी आहे. टीम इंडियाने या साखळीत 16 पैकी 9 सामने जिंकले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाचे पीसीटी पॉइंट्स 57.29 इतके होतील. तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने हे जिंकावे लागतील. त्यामुळेच हा सामना अनिर्णित राहिल्यास नंतरचं सर्व समीकरण हे किचकट स्वरुपाचं होऊन जाईल, त्यामुळे सामना निकाली निघावा, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांची असणार आहे.

दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अंतिम फेरीतील 2 जागांसाठी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात मुख्य लढत आहे

Follow Us
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी