AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC-BCB Controversy: आयसीसीकडून बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दे धक्का! आडमुठी भूमिका आली अंगाशी

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने खूपच घोळ घातला. आयसीसीचं म्हणणं शेवटपर्यंत ऐकलं नाही. त्यामुळे स्पर्धेतून पत्ता कापला गेला. आता आयसीसीने आणखी एक धक्का दिला आहे.

ICC-BCB Controversy: आयसीसीकडून बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दे धक्का! आडमुठी भूमिका आली अंगाशी
आयसीसीकडून बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दे धक्का! आडमुठी भूमिका आली अंगाशी Image Credit source: Getty Images
| Updated on: Jan 23, 2026 | 4:06 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दणका बसला आहे. भारतात खेळणार नसल्याच्या भूमिकेनंतर स्पर्धेतूनच पत्ता कापला आहे. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने देशाच्या क्रिकेटचं किती नुकसान केलं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसी आणि बीसीसीआयसोबत वाकड्यात जाणं महागात पडलं आहे. एकीकडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळत नसल्याने कोट्यवधींचं नुकसान झालं. दुसरीकडे, एक मोठी स्पर्धा हातून गेल्यात जमा झाली आहे. कारण भविष्यात आयसीसी स्पर्धांचं यजमानपद बांगलादेशला मिळणं आता कठीण होणार आहे.

बांगलादेशला काही वर्षांपूर्वी टी20 वर्ल्डकपचं यजमानपद दिलं होतं. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेसाठी भारत श्रीलंकेसोबत यजमान होता. आयसीसी स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्यानंतर आणि वाढती लोकप्रियता पाहून आयसीसीने बांगलादेशला एका मोठ्या स्पर्धेचं यजमानपद दिलं होतं. बांगलादेशला वर्ल्डकप 2031 साठी यजमानपद दिलं होतं. विशेष म्हणजे भारतासोबत त्यांना हे यजमानपद भूषवायचं होतं. पण आता आयसीसीने कठोर भूमिका घेतली तर हे यजमानपद बांगलादेशच्या हातून जाऊ शकतं. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची मोठी कमाई हातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला खूपच मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आयसीसी बांगलादेशची अनेक स्तरांवर कोंडी करू शकते. वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीकडून मिळणारा वार्षिक उत्पन्न बंद केलं जाऊ शकतं. ही रक्कम थोड थोडकी नाही तर 325 कोटी बांगलादेशी टका इतकी आहे. ही रक्कम पूर्ण कापली नाही तर त्यापैकी काही टक्के रक्कम कापली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इतकंच काय स्पर्धेत भाग घेणाऱ्या आणि सामना जिंकवल्यावर मिळणारी रक्कमही हातून जाणार आहे. याचा पूर्ण परिणाम हा बांगलादेशी महिला क्रिकेट टिम आणि अंडर 19 क्रिकेट संघावर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पुढच्या काही वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे बांगलादेशचं क्रिकेट भविष्य अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.