AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत दक्षिण अफ्रिका सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना टळली, झालं असं की…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिकेनंतर टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. असं असताना एक मोठी दुर्घटना होता होता टळली. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

भारत दक्षिण अफ्रिका सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना टळली, झालं असं की...
भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना टळली, झालं असं की...Image Credit source: Screenshot/X
| Updated on: Dec 05, 2025 | 6:41 PM
Share

दक्षिण अफ्रिकेने भारतात येऊन टीम इंडियाला तोडीस तोड उत्तर दिलं आहे. कसोटी मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवला. आता वनडे मालिकेतही दक्षिण अफ्रिकेने 359 धावांचा पाठलाग करून भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना अतितटीचा होणार यात काही शंका नाही. त्यामुळे या सामन्यात काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, 9 डिसेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित नसतील. पण अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहण्याची मजा काही औरच असणार आहे. या मालिकेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव होईल यात काही शंका नाही. हे चित्र प्रत्यक्ष आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी क्रीडाप्रेमींचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांची आतापासूनच धडपड सुरु झाली आहे. टी20 मालिकेच्या तिकीटासाठी आतापासून चाहते धावाधाव करत आहेत. अशा स्थितीत ओडिशामध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली.

टी20 मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी 5 डिसेंबरपासून तिकीट विक्री सुरु झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बाजूने तिकिटांची विक्री सुरु आहे. असं असताना चाहत्यांनी ऑफलाईन तिकीट घेण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. इतकंच काय चेंगराचेंगरी होते की काय अशी भीतीही वाटली. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये गर्दी कशी नियंत्रणाबाहेर गेली होती हे दिसून येईल. तिकीट खरेदी करण्यासाठी लांब रांगा लागल्या होत्या आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसही गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते.

अनियंत्रित गर्दीमुळे काय होऊ शकते हे आरसीबीने आयपीएल जेतेपद जिंकल्यानंतर दिसून आलं आहे. बंगळुरूत गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची गरज असल्याचं दिसत आहे. बीसीसीआयने यातून धडा घेणं आवश्यक आहे. दुसरीकडे ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण ही चूक किती महागात पडली असती हे सांगता येत नाही. त्यामुळे बीसीसीआयने यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम