AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने हातातला सामना गमावला. दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या एका धावेने पराभव झाला. डेविड मिलरने पाचव्या चेंडूवर एक धाव न घेतल्याने पराभवाचं कारण ठरलं. पण आयपीएलचा एक नियम दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडला.

IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं
IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलंImage Credit source: PTI
| Updated on: Apr 09, 2026 | 5:22 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. खरं त हा सामना दिल्लीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला होता. शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 13 धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूत 3 धावा अशी स्थिती आली आणि पाचव्या चेंडूवर डेविड मिलरने फटका मारला. पण धाव घेतली नाही. स्ट्राईक स्वत:कडे ठेवला. पण शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना 1 धाव मिळाली आणि दुसऱ्या धावेवर कुलदीप यादव धावचीत झाला. या पराभवासाठी डेविड मिलरला दोषी धरलं जात आहे. पण आयपीएलमधील एक नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरला आहे. माजी क्रिकेटपटूंनी या नियमावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. पण आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने अद्याव यावर निर्णय घेतलेला नाही. हा नियमच दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात अडसर ठरला. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

आयपीएलमधील वादग्रस्त नियम

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 10व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नितीश राणाविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील झाली. पंचांनी त्याला बाद घोषित केलं. पण नितीश राणा बाद नव्हता आणि चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला लागला होता. या दरम्यान नितीश राणाने एक धाव घेतली. नितीश राणाने पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागितली. त्यात नाबाद असल्याचं स्पष्ट झाला. पण त्याने घेतलेली एक धाव ग्राह्य घेतली गेली नाही. कारण पंचांच्या निर्णयानंतर चेंडू डेड होतो आणि त्यानंतर घेतलेली धाव ग्राह्य धरली जात नाही. जर ही धाव दिल्ली कॅपिटल्सला मिळाली असती तर चित्र वेगळं असतं. निदान सामना टाय झाला असता.

काय म्हणाला कर्णधार अक्षर पटेल?

पराभवाचं विश्लेषण करताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘अर्थातच ज्या प्रकारे आम्ही खेळत आहोत, मला वाटतं दोन्ही संघांनी खूप चांगला क्रिकेट खेळला. आणि हो, मला वाटतं, अशा प्रकारच्या चुरशीच्या सामन्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बोट ठेवू शकता. त्यामुळे मला वाटतं, हो, आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळलो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, चुरशीच्या पाठलागात, चुरशीच्या सामन्यात, तुम्ही अनेक गोष्टींवर बोट ठेवू शकता. पण मला वाटतं की पाठलाग करताना, आम्ही अधिक हुशारीने खेळू शकलो असतो. ज्या महत्त्वाच्या वेळी विकेट्स पडल्या, मला वाटतं जर ते घडलं नसतं, तर आम्ही पाठलाग लवकर पूर्ण करू शकलो असतो.’

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.