AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता टीमच सोडणार असल्याचं समोर येत आहे. हार्दिक पांड्या इतका कठोर निर्णय घेण्याचं कारणही काही रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे.

IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की...
IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2026 | 4:48 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामने गमवत गुणतालिकेत शेवटून दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या संघाची अशी स्थिती पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. असं असताना हार्दिक पांड्या कर्णधारपदच नाही तर संघाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने आयपीएल 2026 स्पर्धेच्या मध्यातच हा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्याने आपला निर्णय फ्रेंचायझीला कळवला असून त्याला तेथूनही हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. आता हार्दिक पांड्याने असा निर्णय घेण्याचं कारण काय? ते जाणून घेऊयात..

रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्यानंतर हार्दिक पांड्याने मॅनेजमेंटला सांगितल होतं की आता संघात राहणार नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी मागच्या तीन वर्षात हवी तशी राहिली नाही. मागच्या पर्वात प्लेऑफमध्ये जागा मिळवली पण पदरी निराशा पडली. त्यामुळे हार्दिक पांड्याने संघापासून वेगळं होण्याचं निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हार्दिक पांड्या 2021 मध्ये मुंबई सोडून गुजरात टायटन्स संघात गेला होता. त्यानंतर 2024 मध्ये संघात परतल्यानंतर त्याला चाहते आणि खेळाडूंचं हवं तसं सहकार्य मिळालं नसल्याची चर्चाही क्रीडावर्तुळात रंगली आहे.

हार्दिक पांड्याला कोणी त्रास दिला?

सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांवरून चर्चा होतं. त्यात एक कारण वेगळंच आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या एका वरिष्ठ खेळाडूवर खूपच नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. या वरिष्ठ खेळाडूने टी20 वर्ल्डकपदरम्यान 100 टक्के कमिंटमेट मागितली होती. पण मुंबई इंडियन्समध्ये परतला तेव्हा त्या खेळाडूने साथ दिली नाही. त्यामुळे हा वरिष्ठ खेळाडू कोण? या चर्चाही रंगल्या आहेत. पण सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांना तसा काही अर्थही नसतो. आता हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर पुढे काय?पांड्या ट्रेड डीलच्या माध्यमातून मुंबई सोडेल की लिलावात उतरेल. हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सचा भाग होऊ शकतो.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा