AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RCB क्वॉलिफायर 1 चा सामना रद्द झाला तर फायनलचं तिकीट कोणाला? जाणून घ्या नियम

आयपीएल 2025 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. हा सामना 29 मे रोजी होणार आहे. पण या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि रद्द करण्याची वेळ आली तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? काय आहे नियम ते जाणून घ्या.

PBKS vs RCB क्वॉलिफायर 1 चा सामना रद्द झाला तर फायनलचं तिकीट कोणाला? जाणून घ्या नियम
विराट कोहली आणि श्रेयस अय्यरImage Credit source: PTI
| Updated on: May 28, 2025 | 4:43 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामना संपले असून 29 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मोहालीच्या मुल्लांपूर स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी बाजी पणाला लावतील यात काही शंका नाही. पण या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामना रद्द करण्याची वेळ आली तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? जाणून घ्या बीसीसीआयने काय नियम आखले आहेत ते..

क्वॉलिफायर 1 सामना रद्द झाला तर कोण अंतिम फेरीत खेळणार?

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन्ही संघांना जेतेपदाची आस आहे. या दोन्ही संघांची जेतेपदाचं स्वप्न मागच्या 17 पर्वात पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे स्वप्नपूर्तीसाठी दोन्ही संघ सर्वस्वी पणाला लावतील यात काही शंका नाही. पण या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय? यापूर्वी साखळी फेरीत सामना रद्द करण्याची वेळ आली आहे. पण त्यावेळेस प्रत्येकी एक एक गुण वाटून हिशेब चुकता केला होता. मात्र आता अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न आहे. पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर एका संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. तर एक संघ क्वॉलिफायर 2 मध्ये खेळेल.

गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाला याचा फायदा मिळेल. म्हणजेच पंजाब किंग्स संघाकडे थेट अंतिम फेरी गाठण्याचं गुणांकन आहे. कारण गुणतालिकेत टॉपला आहे. तर आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे प्रत्येक 19 गुण आहेत. पण पंजाब नेट रनरेटच्या बाबतीत पुढे आहे. जर क्वालिफायर-1 सामना रद्द झाला तर पंजाब किंग्स अंतिम फेरीत पोहोचेल आणि आरसीबीला क्वालिफायर-2 खेळावे लागेल.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचे प्रत्येकी 19 गुण आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरीत 9 सामने जिंकले आहेत. तर 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. पण पंजाब किंग्स आरसीबीपेक्षा +0.071 नेट रनरेटने पुढे आहे. पंजाब किंग्सचे +0.372, आरसीबीचा 0.301 नेट रनरेट आहे. त्यामुळे पंजाब किंग्स गुणतालिकेत टॉपला आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.