AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

भारतीय संघाने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला असून आता भारतीय खेळाडू थेट 24 ऑक्टोबर रोजी विश्वचषकातील पहिल्या सामन्यातचं मैदानात उतरतील. पण यावेळी त्यांच्यासमोर सराव सामना नसून मुख्य सामना असेल आणि सोबतच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान...

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास
भारत विरुद्ध पाकिस्तान
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 4:24 PM
Share

दुबई: टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली असली तरी भारती आणि पाकिस्तान देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष मात्र 24 ऑक्टोबर या तारखेकडे लागले आहे. सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला सामना 24 तारखेला पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) असणार आहे. विश्वचषकातील पहिलाच सामना असण्याबरोबर हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असल्याने भारतीय खेळाडू विजयासाठी सर्व शक्य प्रयत्न करणार हे नक्की!

हा सामना दोन्ही संघासाठी तितकाच महत्त्वाचा आहे कारण या सामन्यातून त्यांचे विश्वचषकातील भविष्य स्पष्ट होईल. त्यामुळे या सामन्यापूर्वी दोघांतील आतापर्यंतच्या सामन्यांच्या इतिहासावर एक नजर फिरवूया… टी – 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. पण प्रत्येक वेळी पाकिस्तानवर भारतीय संघाने सरशी करत विजयश्री मिळवला आहे. सर्वात पहिला टी20 विश्वचषक 2007 साली झाला तेव्हापासून ही लढाई सुरु झाली जी आजवर सुरु आहे.

आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान टी20

2007 टी -20 विश्वचषकात आधी ग्रुप मॅच दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बरोबरीत संपला. ज्यानंतर बॉल आऊटद्वारे निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर 2007 साली अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला नमवत ट्रॉफी जिंकली. त्यानंतर 2012 मध्ये सुपर 8 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. त्याचप्रमाणे 2014 मध्येही सुपर 10 मध्ये प्रथम खेळताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 3 गड्यांच्या बदल्यात 9 चेंडूं राखून हा सामना जिंकला. ज्यानंतर अखेरचा टी20 सामना 2016 मध्ये झाला ज्यात पावसामुळे सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला. त्यातही भारताने पाकिस्तानला  6 गडी राखून पराभूत केले.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

T20 World Cup च्या 2 सराव सामन्यात केवळ 1 धाव, डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म आयपीएलमधील वर्तवणुकीमुळे गेला?

(In T20 World Cup India beat pakistan many times know history of india vs pakistan matches)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.