IND vs AUS : टीम इंडियाला हरवत मालिका जिंकली खरी पण, स्मिथसाठी वाईट बातमी

भारतीय संघावर 21 धावांनी मात करत हा सामना जिंकून मालिका खिशात घातली आहे. स्मिथने आपल्या नेतृत्वाची छाप पाडेलेली दिसून आली. मात्र त्याच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

IND vs AUS : टीम इंडियाला हरवत मालिका जिंकली खरी पण, स्मिथसाठी वाईट बातमी
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 11:43 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना कांगारूंनी आपल्या नावावर केला. भारतीय संघावर 21 धावांनी मात करत हा सामना जिंकून मालिका खिशात घातली आहे. स्मिथने आपल्या नेतृत्वाची छाप पाडेलेली दिसून आली. मात्र त्याच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर उर्वरित फलंदाज किमान दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 10 फलंदाजांनी किमान 10-10 धावा केल्या, पण स्टीव्ह स्मिथला 3 चेंडूत खातेही उघडता आलं नाही. हार्दिक पंड्याने त्याला आऊट केलं.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला 269 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 248 धावांवरच आटोपला. भारताकडून विराट कोहलीने 54 धावांची अर्धशतकी खेळी मात्र दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. कांगारूंनी 21 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाने 269 धावा केल्या आहेत. कांगारूंकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

भारताची बॅटींग- 

भारताची सुरूवात चांगली झाली होती, सलामीवर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी  65 धावांची सलामी दिली होती. रोहित शर्मा 11 धावा करून परतला त्यानंतर लगोलग शुबमनला 37  धावांवर झॅम्पाने पायचीत करत त्यालाही टिकू दिलं नाही. विराट कोहली आणि के. एल. राहुल यांची जोडी जमली होती मात्र मोठा खेळण्याच्या प्रयत्नात तोही 32 धावा करून बाद झाला.

विराट मैदानावर टिकून होता, अक्षर पटेल वरच्या क्रमांकावर खेळायला आला होता. मात्र तो धावबाद झाला त्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराटने आपल्या हातात सुत्र घेतलीत. अर्धशतक करून झाल्यावर विराट बाद झाला. सूर्या आला आणि आजही तो पहिल्याच बॉलवर गेला.  हार्दिक आणि जडेजा मैदानात होते मात्र झॅम्पाने दोघांना बाद करत सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकवला. झॅम्पाने 4 तर अॅश्टन आगर 2, स्टॉइनिस आणि अॅबॉटने 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.