AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाला दुसऱ्या वनडेआधी टेन्शन, आकड्यांमुळे शुबमनसेनेच्या डोकेदुखीत वाढ

India vs New Zealand 2nd ODI: टीम इंडियाने 2026 वर्षातील पहिला एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंड विरूद्ध 1-0 ने आघाडी घेतली. आता टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. मात्र या सामन्याआधी भारताच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

IND vs NZ : टीम इंडियाला दुसऱ्या वनडेआधी टेन्शन, आकड्यांमुळे शुबमनसेनेच्या डोकेदुखीत वाढ
Michael Bracewell and Shubman Gill IND vs NZImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 13, 2026 | 6:50 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. उभयसंघातील दुसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना हा बुधवारी 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताने रविवारी 11 जानेवारीला सलामीचा सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. भारताने न्यूझीलंड विरुद्ध 301 धावांचं आव्हान 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र या सामन्याआधी भारताची आकड्यामुळे चिंता वाढली आहे. भारताची राजकोटमधील वनडे क्रिकेटच्या इतिहासातील आकडेवारी चिंताजनक आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दबदबा आहे. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केलीय. भारताने शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवलाय. तसेच एकदिवसीय संघात एकसेएक आणि तोडीस तोड खेळाडू आहेत. मात्र राजकोटमधील भारताची आकडेवारी हा चिंतेचा विषय आहे. भारताने या मैदानात किती सामने खेळलेत आणि त्यापैकी किती जिंकलेत? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया, वनडे क्रिकेट आणि राजकोट

भारताचा बुधवारी राजकोटच्या इतिहासातील पाचवा एकदिवसीय सामना (Team India Odi Record at Rajkot) असणार आहे. भारताला याआधी झालेल्या 4 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारताने या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 2 तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 1-1 एकदिवसीय सामना खेळला आहे. मात्र त्यापैकी फक्त एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आलाय.

भारताची राजकोटमधील कामगिरी कशी

भारताला 2013 साली या मैदानातील आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून 9 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर 2 वर्षांनी 2015 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

शुबमनसेनेच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष

भारताने राजकोटमध्ये आपल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळत विजयाचं खातं उघडलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा या मैदानात 36 धावांनी धुव्वा उडवला. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 2023 मध्ये झालेल्या सामन्यात पलटवार केला. कांगारुंनी 2025 मध्ये हा सामना 66 धावांच्या अंतराने जिंकून 2023 मधील पराभवाची परतफेड केली. त्यामुळे आता टीम इंडिया बुधवारी दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.