AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Nz: शेवटच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर शिखर धवन एक मोठी गोष्ट बोलला

Ind vs Nz: झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सीरीजच्याआधी शिखर धवनबरोबर असं घडलं होतं.

Ind vs Nz: शेवटच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर शिखर धवन एक मोठी गोष्ट बोलला
Shikhar-Dhawan Image Credit source: PTI
| Updated on: Nov 24, 2022 | 5:32 PM
Share

ऑकलंड: भारत आणि न्यूझीलंडमध्ये शुक्रवारपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. ऑकलंड येथे पहिला वनडे सामना खेळला जाईल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे वनडे टीमच नेतृत्व सोपवण्यात आलय. वर्ष 2022 मध्ये शिखर धवन तिसऱ्यांदा टीमच नेतृत्व करणार आहे. आधी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील वनडे सीरीजमध्ये टीमच नेतृत्व केलं.

अखेरच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवलं

धवनने मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच नेतृत्व केलं होतं. त्यावेळी मुख्य टीम इंग्लंडमध्ये होती. झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सीरीजसाठी शिखर धवनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण अंतिम क्षणी केएल राहुल टीममध्ये आला. तो दुखापतीमधून सावरला होता. त्याला टीम इंडियाच कॅप्टन बनवण्यात आलं.

शिखरला विचारला प्रश्न

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेआधी शिखर धवनला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये शेवटच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं, त्यावेळी तुझ्या भावना काय होत्या?

तेव्हा मला कल्पना होती की….

“तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी भाग्यवान आहे, मला करिअरच्या या टप्प्यावर टीमच नेतृत्व करण्याची संधी मिळतेय. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. आम्ही युवा टीम बरोबर एक चांगली सीरीज जिंकलीय. झिमाब्वे टूरबद्दल बोलायच झाल्यास, केएल राहुल टीमचा मुख्य उपकर्णधार आहे. जेव्हा तो परत आला, तेव्हा मला कल्पना होती की, त्याला आशिया कपमध्ये खेळायच आहे. आशिया कपच्यावेळी रोहितला दुखापत झाली असती, तर त्याच्याजागी राहुल टीमच नेतृत्व करणार होता” असं शिखर धवन म्हणाला.

जे काही होतं, ते चांगल्यासाठीच

“जे काही होतं, ते चांगल्यासाठीच होतं. मला त्यावेळी दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी कॅप्टन बनवण्यात आलं. निवडकर्ते आणि टीम मॅनेजमेंटने मला संधी दिली. मला कधी वाईट वाटत नाही” असं धवन म्हणाला.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.