AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 2nd Match : टीम इंडियाने दुसरा वनडे सामना कुठे गमावला? शुबमन गिलने स्पष्टच सांगितलं..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने पार पडले. या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली होती. तरीही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्या मागचं कारण शुबमन गिलने सामन्यानंतर सांगितलं.

IND vs NZ 2nd Match : टीम इंडियाने दुसरा वनडे सामना कुठे गमावला? शुबमन गिलने स्पष्टच सांगितलं..
टीम इंडियाने दुसरा वनडे सामना कुठे गमावला? शुबमन गिलने स्पष्टच सांगितलं..Image Credit source: PTI
| Updated on: Jan 14, 2026 | 10:10 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 284 धावा केल्या आणि विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान न्यूझीलंडने 47.3 षटकात 3 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो डेरिल मिचेल. त्याने शतकी खेळीसह शेवटपर्यंत नाबाद राहात हा सामना जिंकवून दिला. भारताच्या पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे आता मालिकेचा निकाल तिसऱ्या सामन्यात लागणार आहे. या सामन्यातील पराभवाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहे. कर्णधार शुबमन गिलने सामन्यानंतर या पराभवाचं विश्लेषण केलं. हा सामना नेमका कशामुळे गमावला ते सांगितलं.

शुबमन गिल म्हणाला की, ‘ मधल्या षटकांमध्ये आम्हाला एकही विकेट घेता आली नाही. पाच क्षेत्ररक्षक आत होते. जर तुम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकला नाहीत तर, 15-20 धावा अधिक असत्या तरी ते खूप कठीण होते. जर तुम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट घेतल्या नाहीत तर फलंदाजाला रोखणे खूप कठीण आहे. अशा प्रकारच्या विकेटवर, तुम्हाला माहिती आहेच की, भागीदारी होताच, सेट फलंदाजाला मोठी कामगिरी करावी लागते. कारण येणाऱ्या फलंदाजासाठी मुक्तपणे धावा करणे सोपे नसते. आम्हाला बोर्डवर चांगले लक्ष्य मिळाले नाही आणि आम्ही पहिल्या 10 षटकांमध्ये अपवादात्मकपणे चांगली गोलंदाजी केली. नंतर गोलंदाजीत आम्हाला ज्या प्रकारची सुरुवात मिळाली. परंतु मला वाटते की त्यांनी मधल्या षटकांमध्ये खरोखर चांगली फलंदाजी केली.’

‘आम्ही टाकलेल्या पहिल्या 10-15 षटकांमध्ये चेंडू थोडासा चांगला होता. पण मला वाटतं 20-25 षटकांनंतर, विकेट थोडीशी स्थिरावली असेल. पण मला वाटतं की मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना आपण थोडे अधिक धाडसी असू शकलो असतो. आपल्याला थोडे अधिक संधी मिळू शकल्या असत्या. शेवटच्या सामन्यातही, आपण काही संधी गमावल्या.’, असं शुबमन गिल पुढे म्हणाला.

Follow Us
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.
VSR कंपनीला कुणीतरी वाचवतंय; रोहित पवारांनी व्यक्त केली शंका
VSR कंपनीला कुणीतरी वाचवतंय; रोहित पवारांनी व्यक्त केली शंका.
जय पवारांच्या ट्विटचा संदर्भ; रोहित पवारांचे DGCA आणि VSR वर नवे आरोप
जय पवारांच्या ट्विटचा संदर्भ; रोहित पवारांचे DGCA आणि VSR वर नवे आरोप.