AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 2nd Match : टीम इंडियाने दुसरा वनडे सामना कुठे गमावला? शुबमन गिलने स्पष्टच सांगितलं..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने पार पडले. या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली होती. तरीही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्या मागचं कारण शुबमन गिलने सामन्यानंतर सांगितलं.

IND vs NZ 2nd Match : टीम इंडियाने दुसरा वनडे सामना कुठे गमावला? शुबमन गिलने स्पष्टच सांगितलं..
टीम इंडियाने दुसरा वनडे सामना कुठे गमावला? शुबमन गिलने स्पष्टच सांगितलं..Image Credit source: PTI
| Updated on: Jan 14, 2026 | 10:10 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 284 धावा केल्या आणि विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान न्यूझीलंडने 47.3 षटकात 3 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो डेरिल मिचेल. त्याने शतकी खेळीसह शेवटपर्यंत नाबाद राहात हा सामना जिंकवून दिला. भारताच्या पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे आता मालिकेचा निकाल तिसऱ्या सामन्यात लागणार आहे. या सामन्यातील पराभवाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहे. कर्णधार शुबमन गिलने सामन्यानंतर या पराभवाचं विश्लेषण केलं. हा सामना नेमका कशामुळे गमावला ते सांगितलं.

शुबमन गिल म्हणाला की, ‘ मधल्या षटकांमध्ये आम्हाला एकही विकेट घेता आली नाही. पाच क्षेत्ररक्षक आत होते. जर तुम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकला नाहीत तर, 15-20 धावा अधिक असत्या तरी ते खूप कठीण होते. जर तुम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट घेतल्या नाहीत तर फलंदाजाला रोखणे खूप कठीण आहे. अशा प्रकारच्या विकेटवर, तुम्हाला माहिती आहेच की, भागीदारी होताच, सेट फलंदाजाला मोठी कामगिरी करावी लागते. कारण येणाऱ्या फलंदाजासाठी मुक्तपणे धावा करणे सोपे नसते. आम्हाला बोर्डवर चांगले लक्ष्य मिळाले नाही आणि आम्ही पहिल्या 10 षटकांमध्ये अपवादात्मकपणे चांगली गोलंदाजी केली. नंतर गोलंदाजीत आम्हाला ज्या प्रकारची सुरुवात मिळाली. परंतु मला वाटते की त्यांनी मधल्या षटकांमध्ये खरोखर चांगली फलंदाजी केली.’

‘आम्ही टाकलेल्या पहिल्या 10-15 षटकांमध्ये चेंडू थोडासा चांगला होता. पण मला वाटतं 20-25 षटकांनंतर, विकेट थोडीशी स्थिरावली असेल. पण मला वाटतं की मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना आपण थोडे अधिक धाडसी असू शकलो असतो. आपल्याला थोडे अधिक संधी मिळू शकल्या असत्या. शेवटच्या सामन्यातही, आपण काही संधी गमावल्या.’, असं शुबमन गिल पुढे म्हणाला.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…