AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला

भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे पहिला कसोटी सामना असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने सुरू झाला. लंच ब्रेकनंतर भारतीय संघ मैदानात उतरला. 288 धावांच्या पुढे खेळताना भारताला अडचणींचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या फिरकीचा सामना करताना भारतीय संघ अडचणीत आला.

IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला
IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरलाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 16, 2026 | 6:23 PM
Share

भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर पकड मिळवली पण धावगतीला काही अंशी ब्रेक लागला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 9 गडी गमवून 460 धावा केल्या आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी 43 षटकांचा खेळ झाला आणि 172 धावा आल्या. त्यात श्रीलंकेने फिरकीच्या जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघ पहिल्या डावात 2 गडी गमवून 288 धावांवर खेळत होता. पण या धावांचा पुढे खेळताना भारताच्या धडाधड सात विकेट पडल्या. भारताने अवघ्या 172 धावा करताना 7 विकेट गमवल्या आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुलदीप यादव 12 आणि प्रसिद्ध कृष्णा 1 या धावसंख्येवर नाबाद तंबूत परतले. आता तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय किती धावा करणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

भारताकडून देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत ही जोडी दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरली होती. पण पावसामुळे खेळपट्टीचा पूर्ण अंदाजच बदलून गेला होता. ऋषभ पंत चुकीचा फटका मारताना 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला केएल राहुल आला. रिटायर्ड हर्ट होऊन पहिल्या दिवशी 77 धावा करून गेला होता. त्या पुढे खेळताना त्या फक्त 5 धावा जोडल्या आणि 82 धावा करून तंबूत परतला. देवदत्त पडिक्कलने 150 धावांचा पल्ला ओलांडत धावसंख्येत भर घातली. पण त्याचा खेळही 167 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेलकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण रवींद्र जडेजा 13 धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे भारताची स्थिती नाजूक झाली. असं असताना ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने डाव सावरल्याने भारताने मजबूत स्थितीत आला.

ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने सातव्या विकेटसाठी 66 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने 68 चेंडूत 51 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर लगेचच मानव सुथारही 24 धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजचा खेळ 11 धावांवर आटोपला. त्यामुळे भारत सर्वबाद होतो की काय असा प्रश्न होता. पण कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी झुंज दिली. आता तिसऱ्या दिवशी ही जोडी पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने 4, केशारा नुवांथाने 3 आणि असिथा फर्नांडोने 1 विकेट काढली.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता