AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : शर्मा-वर्माची फटकेबाजी, टीम इंडिया 200 पार, श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

India vs Sri Lanka Super 4 1st Innings Updates : श्रीलंकेला सुपर 4 मध्ये विजयाचं खातं उघडण्यासाठी 120 बॉलमध्ये 203 धावा करायच्या आहेत. टीम इंडिया सलग सहावा विजय मिळवणार का?

IND vs SL : शर्मा-वर्माची फटकेबाजी, टीम इंडिया 200 पार, श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Sanju Samson Tilak Varma and Abhishek SharmaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Sep 26, 2025 | 10:38 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत जे कुणालाच जमलं नाही ते टीम इंडियाने करुन दाखवलं आहे. टीम इंडियाने सुपर 4 मधील सहाव्या आणि अंतिम सामन्यात 200 पार मजल मारली आहे. इंडिया यासह 17 व्या आशिया कप स्पर्धेत 200 धावा करणारी पहिली टीम ठरली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. टीम इंडियासाठी ओपनर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या त्रिकुटाने सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनीही टीम इंडियाला 200 पार पोहचवण्यात योगदान दिलं. आता टीम इंडिया या धावांचा यशस्वी बचाव करत सलग सहावा विजय मिळवणार की श्रीलंका या स्पर्धेत जाता जाता शेवट गोड करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

टीम इंडियासाठी शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या या दोघांनी निराशा केली. शुबमनने 4 आणि हार्दिकने 2 धावा केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र सूर्या पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सूर्याने 12 धावा केल्या. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

अभिषेकने सुपर 4 मध्ये सलग तिसरं अर्धशतक ठोकलं. अभिषेकने 31 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 फोरसह 61 रन्स केल्या. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने 23 बॉलमध्ये 23 सिक्स आणि 1 फोरसह 39 रन्स केल्या.

तिलक वर्मा आणि अक्षर पटेल या जोडीने सहाव्या विकेटसाठी नॉट आऊट 40 रन्सची पार्टनरशीप केली. या जोडीने केलेल्या या भागीदारीमुळे टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 202 धावांपर्यंत पोहचता आलं. अक्षर पटेल याने 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 21 रन्स जोडल्या. तर तिलक वर्मा याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने अधुर राहिलं. तिलकने 34 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 49 धावा केल्या. श्रीलंकेकडून महीश तीक्षणा, चमीरा, वानिंदु हसरंगा, दासून शनाका आणि कॅप्टन चरिथ असलंका या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान

श्रीलंका टीम इंडियाला रोखणार?

दरम्यान श्रीलंकेने साखळी फेरीत सलग 3 सामने जिंकले. मात्र त्यानंतर श्रीलंकेला सुपर 4 मध्ये सलग 2 सामने गमवावे लागले. तर टीम इंडियाने सलग 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता श्रीलंका जाता जाता हा सामना जिंकून टीम इंडियाला सलग सहावा विजय मिळवण्यापासून रोखणार का? याासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.