AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : पहिल्या डावात वेस्ट इंडिज बॅकफूटवर, टीम इंडियाला आघाडी घेण्यासाठी फक्त 42 धावांची गरज

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. त्यामुळे उर्वरित चार दिवसात विजयाच्या आशा वाढल्या आहे. भारताकडे पहिल्या डावात आघाडी घेण्याची मोठी संधी आहे.

IND vs WI : पहिल्या डावात वेस्ट इंडिज बॅकफूटवर, टीम इंडियाला आघाडी घेण्यासाठी फक्त 42 धावांची गरज
IND vs WI : पहिल्या डावात वेस्ट इंडिज बॅकफूटवर, टीम इंडियाला आघाडी घेण्यासाठी फक्त 42 धावांच गरजImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 02, 2025 | 5:52 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेतील भारताचा दुसरी कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्याने प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या दिवशीच बॅकफूटवर गेला. वेस्ट इंडिजने 44.1 षटकांचा सामना केला आणि सर्व विकेट गमावले. वेस्ट इंडिज पहिल्या डावात फक्त 162 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात आघाडी घेण्याची मोठी संधी आहे. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 गडी गमवून 121 धावा केल्या आहे. अजूनही भारताला पहिल्या डावात बरोबरी करण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच 42 व्या धावेपासून आघाडी घेण्यास सुरुवात होणार आहे.

भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वाल 54 चेंडूत 7 चौकार मारून 36 धावा करून बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात आला. खरं तर त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने अपेक्षा भंग केला. तिसऱ्या क्रमांकावर त्याला काही क्रीडारसिकांची मनं जिंकता आली नाही. या सामन्यात भारताची स्थिती पाहता तसं काही प्रेशर नव्हतं. पण 19 चेंडूंचा सामना करून फक्त 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 31 धावांची भागीदारी केली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केएल राहुलने 114 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या. तर शुबमन गिल 42 चेंडूंचा सामना करत एका चौकारासह नाबाद 18 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ खऱ्या अर्थाने भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचं काही एक चाललं नाही. मोहम्मद सिराजे 14 षटकं टाकली. यात त्याने 40 धावा देत 4 गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने 42 धावा देत 3 गडी बाद केले. कुलदीप यादवने 2, तर वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत