AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान? असं आहे समीकरण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. गुणतालिकेत टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेंच सुरु झालं आहे. असं असताना सध्या एक वेगळाच अंदाज बांधला जात आहे. भारत आणि पाकिस्तान हे संघ अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात.

WTC 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान? असं आहे समीकरण
WTC 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान, असं आहे समीकरणImage Credit source: PTI
| Updated on: Oct 15, 2025 | 6:25 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या मागच्या तीन पर्वात तीन वेगवेगळे विजेते पाहायला मिळाले आहेत. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने, दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने आणि तिसऱ्या पर्वात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आहे. आता चौथ्या पर्वात अंतिम फेरीत कोण जागा मिळवणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. या पर्वात पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आहे. गतविजेत्या दक्षिण अफ्रिकेला पहिल्याच सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानने थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. असं असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीची लढत होऊ शकते असं चित्र आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत भारताचे 11 सामने शिल्लक आहेत. यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2, श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 सामन्यांची मालिका होणार आहे. यात न्यूझीलंड आणि श्रीलंका दौरा त्यांच्या भूमीत असेल. त्यामुळे भारतासाठी या दोन मालिका कठीण असतील. 14 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेविरुद्ध, त्याने ऑगस्ट 2026 मध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 मध्ये न्यूझीलंड दौरा करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. ही मालिका जानेवारी-फेब्रुवारी2027 मध्ये होणार आहे.

भारत आपल्याच भूमीत एकूण 7 सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेसाठी हा कठीण पेपर असेल. त्यामुळे टीम इंडियाला अंतिम फेरीची संधी आहे.पाकिस्तानचंही असंच काहीसं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 पर्वात पाकिस्तान 12 कसोटी खेळेल. यात पाच कसोटी सामने मायभूमीत, तर 7 कसोटी सामने विदेशात खेळणार आहे. दक्षिण अफ्रिकेनंतर पाकिस्तानचा संघ श्रीलंकेशी सामना करेल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची मालिका घरच्या मैदानावरच होईल. त्यानंतर मार्च 2026 मध्ये बांग्लादेश दौऱ्यात दोन सामने खेळेल. जुलै 2026 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाईल. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाईल.

पाकिस्तानला बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजचा दौरा सोप असेल. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याची मोठी संधी असेल. असं झालं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना होऊ शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या स्थानी श्रीलंका, तर चौथ्या स्थानी भारत आहे. इंग्लंडची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.