AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केलं. यासह आता उपांत्य फेरीची रंगत वाढली आहे. भारत वेस्ट इंडिज सामन्यातील विजेत्याला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण झिम्बाब्वेचा फैसला झाला आहे.

टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट
टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 10:36 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 256 धावा केल्या. तसेच विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 184 धावा केल्या. भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला.  यामुळे झिम्बाब्वेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. झिम्बाब्वेचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. झिम्बाब्वेने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली होती. या खेळीच्या जोरावर त्यांनी सुपर 8 फेरीत पहिल्यांदाच जागा मिळवली होती. पण सुपर 8 फेरीत पदरी निराशा पडली. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने दारूण पराभव केला. त्यानंतर भारताने पराभवाची धूळ चारली. आता या स्पर्धेचा शेवट झिम्बाब्वे कसा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दक्षिण अफ्रिकेला मिळालं रिटर्न गिफ्ट

दुसरीकडे, भारताच्या विजयाने दक्षिण अफ्रिकेला रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. भारताच्या विजयामुळे दक्षिण अफ्रिकेचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं झालं आहे. दक्षिण अफ्रिकेने भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांना पराभूत करत उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना हा औपचारिक असणार आहे. पण भारत आणि वेस्ट इंडिजसाठी करो या मरोची लढाई असेल.

करो या मरो सामना

तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसऱ्या संघासाठी चुरस असणार आहे. हा सामना 1 मार्चला होणार आहे. या सामन्यात विजय हा एकमेव पर्या असणार आहे. त्यामुळे नेट रनरेट वगैरे काहीच भानगड नसेल. त्यामुळे विजयाचं गणित सोडवण्याचं आव्हान असणार आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकताच उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार नाही हे पक्कं आहे.  कारण भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्यामुळे इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी सामना होईल. तर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.

Follow Us
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.