AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केलं. यासह आता उपांत्य फेरीची रंगत वाढली आहे. भारत वेस्ट इंडिज सामन्यातील विजेत्याला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण झिम्बाब्वेचा फैसला झाला आहे.

टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट
टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 10:36 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 256 धावा केल्या. तसेच विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 184 धावा केल्या. भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला.  यामुळे झिम्बाब्वेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. झिम्बाब्वेचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. झिम्बाब्वेने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली होती. या खेळीच्या जोरावर त्यांनी सुपर 8 फेरीत पहिल्यांदाच जागा मिळवली होती. पण सुपर 8 फेरीत पदरी निराशा पडली. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने दारूण पराभव केला. त्यानंतर भारताने पराभवाची धूळ चारली. आता या स्पर्धेचा शेवट झिम्बाब्वे कसा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दक्षिण अफ्रिकेला मिळालं रिटर्न गिफ्ट

दुसरीकडे, भारताच्या विजयाने दक्षिण अफ्रिकेला रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. भारताच्या विजयामुळे दक्षिण अफ्रिकेचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं झालं आहे. दक्षिण अफ्रिकेने भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांना पराभूत करत उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना हा औपचारिक असणार आहे. पण भारत आणि वेस्ट इंडिजसाठी करो या मरोची लढाई असेल.

करो या मरो सामना

तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसऱ्या संघासाठी चुरस असणार आहे. हा सामना 1 मार्चला होणार आहे. या सामन्यात विजय हा एकमेव पर्या असणार आहे. त्यामुळे नेट रनरेट वगैरे काहीच भानगड नसेल. त्यामुळे विजयाचं गणित सोडवण्याचं आव्हान असणार आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकताच उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार नाही हे पक्कं आहे.  कारण भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्यामुळे इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी सामना होईल. तर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर.
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप.
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?.
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले.
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा.