AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावांनी उडवला धुव्वा, मालिका 4-1 ने खिशात

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका भारताने 4-1 ने जिंकली. या मालिकेत इंग्लंडला एकमेव सामना जिंकता आला. यासह भारतीय संघ 2012 पासून इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत अजेय राहिला आहे.

भारताने पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावांनी उडवला धुव्वा, मालिका 4-1 ने खिशात
Image Credit source: BCCI
| Updated on: Feb 03, 2025 | 12:26 AM
Share

भारताने पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर ही मालिका भारताने आधीच जिंकली होती. पण पाचवा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा मानस होता. जोस बटलरने दव फॅक्टर समोर ठेवलं होतं. पण अभिषेक शर्माच्या वादळाबाबत अनभिज्ञ होता. अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर 37 चेंडूत शतक पूर्ण केलं. यानंतर त्याच्या फलंदाजीचा झंझावात सुरु होता. अभिषेक शर्माने 54 चेंडूत 135 धावा केल्या. त्याने 250 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान खरं तर खूपच कठीण होतं. पण इंग्लंडने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर धडाधड विकेट पडल्या आणि पराभव निश्चित झाला. इंग्लंडचा डाव 97 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना 150 धावांनी जिंकला.

इंग्लंडकडून फिलीप सॉल्टने चांगली खेळी केली. त्याने 23 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. पण त्याची विकेट काढण्यात शिवम दुबेला यश आलं. त्यानंतर संपूर्ण सामना भारताच्या पारड्यात झुकला. त्याच्याशिवाय इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याने 2.3 षटकात 25 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर रवि बिष्णोईने एक गडी बाद करण्यात यश मिळवलं.  या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने अभिषेक शर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 ने जिंकली. 2012 पासून या दोन्ही संघात टी20 मालिका होत आहेत. पण तेव्हापासून टीम इंडिया प्रत्येक वेळी इंग्लंडवर भारी पडली आहे. मग ती मालिका भारतात असो की इंग्लंडमध्ये.. भारतीय संघ प्रत्येक वेळी इंग्लंडवर भारी पडला आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.