WTC Points Table : शेजाऱ्यांमुळे भारताचं नुकसान, NZ ला हरवूनही गुणतालिकेत पहिलं स्थान नाहीच

भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने मुंबई कसोटी 372 धावांनी जिंकून मालिका 1-0 अशी खिशात घातली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 मधील भारताचा हा पहिला मालिका विजय आहे.

WTC Points Table : शेजाऱ्यांमुळे भारताचं नुकसान, NZ ला हरवूनही गुणतालिकेत पहिलं स्थान नाहीच
Team India
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 2:41 PM

मुंबई : भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने मुंबई कसोटी 372 धावांनी जिंकून मालिका 1-0 अशी खिशात घातली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 मधील भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. या निकालानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही बदल झाला आहे. पण भारताच्या स्थितीवर फारसा परिणाम झाला नाही. चला तर मग जाणून घेऊया कसोटी मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करून भारताने WTC गुणतालिकेत किती कमाई केली आणि आता टीम इंडिया कोणत्या स्थानावर आहे? तसेच कोणता संघ WTC च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल आहे हे देखील जाणून घेऊया. (India is on 3rd place in ICC WTC points table after defeating new zealand in series)

मुंबई कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे 42 गुण झाले आहेत. तसेच त्यांची विजयी टक्केवारी आता 58.33 इतकी आहे. यासह भारत पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी तीन जिंकले आहेत, दोन ड्रॉ केले आहेत आणि एक सामना गमावला आहे. भारताने WTC मध्ये दोन कसोटी मालिका खेळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा निर्णय अद्याप झालेला नाही, मात्र या मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. तर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवला आहे.

श्रीलंका अव्वल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत श्रीलंका सध्या अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. श्रीलंका 24 गुण आणि 100 टक्के सरासरीसह अव्वल स्थानावर आहे. गुणतालिकेतील संघांचे स्थान जिंकलेल्या गुणांच्या आधारे ठरवले जात नाही. भारत आणि श्रीलंकेच्या बाबतीत. भारताचे 42 गुण असले तरी टिम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसमुळे काही मालिका रद्द झाल्यामुळे आयसीसीने यावेळी सुरुवातीपासून पॉइंट्सची टक्केवारी प्रणाली लागू केली आहे. या आधारे विजयासाठी 100 टक्के गुण दिले जातील, तर सामना बरोबरीत सुटल्यास 50 टक्के गुण आणि सामना अनिर्णित झाल्यास दोन्ही संघांना 33.33 टक्के गुण मिळतील. अशा परिस्थितीत एखादा संघ कमी-जास्त सामने खेळतो, कमकुवत संघाविरुद्ध खेळतो किंवा बलाढ्य संघाविरुद्ध खेळतो, सर्वांना समान गुण दिले जातील.

पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर

कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पाकिस्तान सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी तीन कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन जिंकले आणि एक गमावला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 24 गुण आणि विजयी टक्केवारी 66.66 अशी आहे. पाकिस्तान सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.

इंग्लंड चौथ्या स्थानी

उर्वरित संघांबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड एक विजय, एक अनिर्णित आणि दोन पराभवांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 14 गुण आणि 29.17 टक्के गुण आहेत. एक विजय आणि तीन पराभवांसह 12 गुण आणि 25 टक्के गुणांसह वेस्ट इंडिज पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे चार गुण आणि 16.66 टक्के गुण आहेत आणि ते सहाव्या क्रमांकावर आहे.

इतर बातम्या

IND vs NZ : टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, किवी संघाने हिरावलेलं पहिलं स्थान परत मिळवलं

ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे ‘चौकार’, मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?

(India is on 3rd place in ICC WTC points table after defeating new zealand in series)

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.