AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीत

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता सुपर 8 फेरीच्या टप्प्यात आली आहे. आता या टप्प्यात उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी 8 संघ लढणार आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी प्रशिक्षकाने उपांत्य फेरीच्या चार संघांबाबत भाकीत वर्तवलं आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या चार संघांना पसंती दिली ते..

भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीत
भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीतImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 20, 2026 | 4:37 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. सुपर 8 फेरीतील गट 1 मध्ये भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ आहेत. या दोन गटातील टॉप दोन संघ उपांत्य फेरीत जागा मिळवणार आहेत. आता या दोन गटातून कोणत्या चार संघांची उपांत्य फेरीत जागा पक्की होते हे आता सांगणं कठीण आहे. पण आजी माजी क्रिकेटपटूंनी आतापर्यंतचा खेळ पाहून चार संघांची निवड केली आहे. यात युजवेंद्र चहल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद कैफ, वरून एरॉन, सबा करीम सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. भारताची माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यानेही उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. कोणत्या गटातून कोणते दोन संघ उपांत्य फेरीत गाठतील याबाबत सांगितलं आहे.

संजय बांगर यांच्या मते, गट 1 मधून भारत, दक्षिण अफ्रिका आणि गट 2 मधून पाकिस्तान श्रीलंका जागा मिळवतील. संजय बांगर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हे भाकीत वर्तवलं आहे. दुसरीकडे, चहलने दुसऱ्या गटातून वेगळं भाकीत वर्तवलं आहे. त्याच्या मते भारत आणि दक्षिण अफ्रिका उपांत्य फेरी गाठतील. पण दुसऱ्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलं हे संघ उपांत्य फेरीत असतील. माजी वेगवान गोलंदाज वरूण एरॉनच्या मते, भारत-वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ असतील. तर सबा करिमच्या मते, भारत-दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड-श्रीलंका हे संघ असतील. दिग्गजांनी भाकीत काही वर्तवलेलं असून पण त्यात भारतीय संघ आहेच.

सुपर 8 फेरीत तीन सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरी निश्चितपण गाठणार आहे. तर किमान दोन सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. पण यात समीकरण नेट रनरेटवर येऊ शकते. त्यामुळे आता पुढे काय होते? याची उत्सुकता लागून आहे. भारताचा पहिलाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी, तर तिसरा सामना 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजशी होणार आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.