AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 1st Day : साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस सुरुच, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 11:10 PM
Share

India vs New Zealand Live Score : भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट म्हणजे सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 1st Day : साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस सुरुच, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final

India vs New Zealand WTC Final 2021 : India vs New Zealand WTC Final 2021 : पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (WTC Final 2021) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या उभय संघांमध्ये होणार आहे. साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) आजपासून या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला होता. त्यामुळे हा सामना 19 जून ते 23 जूनदरम्यान खेळवला जाईल. (India vs New Zealand live score WTC Final 2021 1st Day Match Scorecard online Southampton in marathi)

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 18 Jun 2021 07:21 PM (IST)

    साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस सुरुच, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

    साऊथॅम्प्टनमध्ये अजूनही पाऊस सुरुच आहे, त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

  • 18 Jun 2021 06:22 PM (IST)

    साऊथॅम्प्टनमध्ये अजूनही पाऊस सुरु, दुसऱ्या सत्रावरही प्रश्नचिन्ह

  • 18 Jun 2021 02:44 PM (IST)

    ‘जिसे डरते थे वहीं बात हो गयी’, फायनलची खराब सुरुवात, पावसामुळे पहिलं सेशन रद्द!

    भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट ही आहे की सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे. आशा आहे लंचनंतर तरी सामन्याचं दुसरं सेशन सुरु होईल.

  • 18 Jun 2021 02:19 PM (IST)

    India vs New Zealand : टॉसचा बॉस कोण होणार?

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात टॉसचा बॉस कोण होणार, याकडे समस्त क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.

  • 18 Jun 2021 02:18 PM (IST)

    भारताने टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करावी की फिल्डिंग? गांगुली म्हणतो, ‘बॅटिंग करावी’!

    अंतिम सामन्याचं मैदान मारणं ही भारतासाठी सर्वांत मोठी संधी आहे. माझ्या कर्णधार विराटसह सगळ्या संघाला शुभेच्छा आहेत. सगळ्याच खेळाडूंनी मोठ्या मेहनीतने इथपर्यंतचा प्रवास केलाय. त्यांच्या मेहनतीमुळेच भारतीय संघ आज अंतिम सामना खेळतो आहे. अंतिम सामना खेळताना संघावर दबाव जरुर असेल. पण भारतीय टीमने दबाव झुगारन खेळावं. अंतिम सामन्यात जर भारताने टॉस जिंकला तर विराटने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला गांगुलीने दिला आहे.

  • 18 Jun 2021 02:17 PM (IST)

    पुढच्या काही मिनिटांत टॉस होणार

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला (WTC Final 2021) सुरुवात व्हायला अगदी काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. पुढच्या 15 मिनिटांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि किवी कर्णधार केन विल्यमसन टॉससाठी मैदानात येतील.

Published On - Jun 18,2021 2:08 PM

Follow us
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.