AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंडिया-पाकिस्तान वनडे सामन्याची घोषणा, महामुकाबला केव्हा?

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान हे 2 कट्टर आणि चिर प्रतिद्वंदी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. जाणून घ्या हा बहुप्रतिक्षित सामना केव्हा होणार?

India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंडिया-पाकिस्तान वनडे सामन्याची घोषणा, महामुकाबला केव्हा?
india_vs_pakistan_flag
| Updated on: Nov 09, 2024 | 10:09 AM
Share

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान शेजारी पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाचा पाकिस्तानला जाण्यासाठी विरोध आहे. आम्ही भारतीय खेळाडूंना पाकिस्तानला पाठवणार नाही, या भूमिकेवर बीसीसीआय ठाम आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. त्याआधी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात एकमेकांविरुद्ध करणार आहेत. हा सामना 30 नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार, टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि जपान ए ग्रुपमध्ये आहेत. तर बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ बी ग्रुपमध्ये आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा 29 नोव्हेंबरला होणार आहे. तर अंतिम सामना हा 8 डिसेंबरला पार पडणार आहे. तर त्याआधी 6 डिसेंबरला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने होणार आहेत.

बांगलादेश गेल्या वेळेस अंडर 19 आशिया कप स्पर्धेचा विजेता ठरला होता. तेव्हा भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला होता. तेव्हाही आणि आताही या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे.

अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

भारताचे सामने आणि तारीख

भारत विरुद्ध पाकिस्तान, शनिवार 30 नोव्हेंबर, दुबई

भारत विरुद्ध जपान, सोमवार 2 डिसेंबर, शारजाह

भारत विरुद्ध यूएई, बुधवार 4 डिसेंबर, शारजाह

सेमी फायनल 1, शुक्रवार 6 डिसेंबर, दुबई

सेमी फायनल 2, शुक्रवार 6 डिसेंबर, शारजाह

फायनल, रविवार 8 डिसेंबर, दुबई

टीम इंडिया यशस्वी

अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्याची ही यंदाची 11 वी वेळ आहे. टीम इंडिया या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरली आहे. टीम इंडिया 10 पैकी 8 वेळा आशिया चॅम्पियन ठरली आहे. भारताला 2023 आणि 2017 साली अपयश आलं होतं.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.