AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची Playing 11

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर या सीरीज मधला पहिला सामना होत आहे.

IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची Playing 11
ind vs wiImage Credit source: bcci
| Updated on: Jul 22, 2022 | 6:49 PM
Share

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर या सीरीज मधला पहिला सामना होत आहे. विजयाने सीरीजची सुरुवात करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा संघ इंग्लंडचा दौरा (England Tour) आटोपून वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालाय. इंग्लंड दौऱ्यात टीन इंडियाने एजबॅस्टनचा एकमेव कसोटी सामना गमावला. पण टी 20 आणि वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी थोडा वेगळा संघ आहे. टीम इंडियातील सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे भारताचे प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.

दुखापतीमुळे एक जण बाहेर

या मालिकेसाठी भारताचं नेतृत्व शिखर धवनच्या हाती आहे. दुसऱ्यांदा शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. मागच्यावर्षी श्रीलंका दौऱ्यात त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र, पहिल्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. जडेजाला वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण, तो जखमी झाला आहे. यामुळे तो संघाच्या इनडोअर सराव सत्रातही सहभागी झाला नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, पण ज्या पद्धतीने तो सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळत नाहीय, त्याच्याजागी शुभमन गिलला संधी मिळाली आहे.

पाऊस व्यत्यय आणेल का?

भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठरल्यावेळेला 7 वाजता सामना सुरु होईल. पण एकतासाने 8 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस किती वेळासाठी पडेल, हे त्यावेळीच समजेल. पाऊस त्यावेळी थांबला, तरी पुन्हा अडीच-तीन तासांनी कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे आजच्या सामन्यासाठी सामना कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावा, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करावी लागेल.

क्वीन्स पार्क ओव्हलवर भारताचा रेकॉर्ड

क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर नेहमीच भारताचा चांगला रेकॉर्ड राहिला आहे. वेस्ट इंडिज नंतर या मैदानावर भारतानेच सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त सामने जिंकलेही आहेत. टीम इंडिया या मैदानावर एकूण 21 वनडे सामने खेळली आहे. त्यात 11 सामने जिंकलेत, 9 सामन्यात पराभव झाला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

भारताची प्लेइंग 11

भारतः शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.