AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Ireland : भारताच्या आयर्लंडवरील विजयामुळे पाकिस्तानच स्वप्न मोडलं, जाणून घ्या कसं

IND vs IRE T20 WC : भारताने विजय मिळवून पाकिस्तानला धक्का दिला. सोमवारी हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला क्रिकेट टीमने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला.

India vs Ireland : भारताच्या आयर्लंडवरील विजयामुळे पाकिस्तानच स्वप्न मोडलं, जाणून घ्या कसं
pakistan womens cricket teamImage Credit source: pcb
| Updated on: Feb 21, 2023 | 7:46 AM
Share

IND vs IRE T20 WC : क्रिकेट विश्वात भारत आणि पाकिस्तान या दोन परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी टीम आहेत. दोन्ही टीम्स परस्पराविरुद्ध द्विक्षीय सीरीज खेळत नाहीत, पण आयसीसी टुर्नामेंट्स आणि एशिया कप सारख्या टुर्नामेंटमध्ये दोन्ही टीम्स आमने-सामने येतात. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्समध्ये सामना झाला होता. भारत आणि पाकिस्तानचा पहिलाच सामना परस्पराविरुद्ध होता. यात भारताने विजय मिळवून पाकिस्तानला धक्का दिला. सोमवारी हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला क्रिकेट टीमने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला. पाकिस्तानच स्वप्न मोडलं, असं म्हटलं तरी चालेल.

टीम इंडियाने किती रन्स केल्या?

भारतीय महिला टीमने सोमवारी आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्ध ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना खेळला. सेमीफायनल प्रवेशासाठी भारताला हा सामना जिंकण आवश्यक होतं. भारताने डकवर्थ लुइस नियमांतर्गत हा सामना 5 धावांनी जिंकला. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने प्रवेश केला. भारताने पहिली बॅटिंग केली. 6 विकेट गमावून 155 धावा केल्या. आयर्लंडच्या टीमने 8.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 54 धावा केल्या. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. आयर्लंडची टीम नियमाच्या हिशोबाने भारतपेक्षा 5 धावांनी पिछाडीवर होती. पावसामुळे सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे भारताला विजयी घोषित केलं. भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश करुन पाकिस्तानच स्वप्न मोडलं.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

ग्रुप 2 मधून पहिलं सेमीफायनलच तिकीट कोणाला?

भारत-आयर्लंडमधील या मॅचकडे पाकिस्तानचे डोळे लागले होते. कारण या मॅचच्या निकालावर पाकिस्तानच टुर्नामेंटमधील पुढील भवितव्य ठरणार होतं. ग्रुप 2 मधून भारताच्या आधी इंग्लंड टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानचा रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध सामना झाला. या मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. नेट रनरेटमध्ये भारतापेक्षा पाकिस्तान सरस

पाकिस्तानचा सेमीफायनल प्रवेश भारत-आयर्लंड सामन्यावर अवलंबून होता. आयर्लंडने भारताला हरवल्यास पाकिस्तान टीमच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत रहाणार होत्या. आय़र्लंड जिंकल्यास पाकिस्तानच्या मंगळवारी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याला महत्त्व प्राप्त होणार होतं. पाकिस्तानने इंग्लंडला हरवल्यास त्यांना सेमीफायनलच तिकीट मिळणार होतं. नेट रनरेटमध्ये भारतापेक्षा पाकिस्तानची बाजू सरस होती. या सगळ्या जर-तरच्या खेळावर पाकिस्तानच वर्ल्ड कप विजयाच स्वप्न अवलंबून होतं.

Follow Us
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.