AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेबाबत A टु Z माहिती, जाणून घ्या सर्वकाही

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेची वैशिष्ट्य काय? या स्पर्धेला पहिल्यांदा कोणत्या साली सुरुवात झाली? या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता? जाणून घ्या सर्वकाही.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेबाबत A टु Z माहिती, जाणून घ्या सर्वकाही
Asia Cup TrophyImage Credit source: X
| Updated on: Sep 09, 2025 | 4:42 AM
Share

क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे.17 व्या आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2025) सुरुवात होण्यासाठी काही तासांचा अवधी बाकी आहे. या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईत करण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हे दुबई आणि अबुधाबीतील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये चुरस असणार आहे. 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेबाबत सर्वकाही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात.

भारताचा मान यूएईला कसा काय?

खरंतर आशिया कप 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे होता. भारत-पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धचा सामन्याला भारतात खेळवण्याला तीव्र विरोध होता. तसेच भारतात सामने झाले असते तर टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्धचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळावे लागले असतात. त्यामुळे भारताने यजमानपद कायम ठेवलं. मात्र सर्व सामने हे यूएईतच होणार आहेत.

पहिली आशिया कप स्पर्धा केव्हा?

पहिल्यांदा 1984 साली आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा फक्त 3 संघच या स्पर्धेत होते. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 संघांचा समावेश होता.

सर्वात यशस्वी संघ कोणता?

आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारत सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने एकूण 8 वेळा आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलंय. भारतीय संघ गतविजेता आहे. भारताने 2023 मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वनडे आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेवर विजय मिळवला होता. भारतानंतर श्रीलंका या स्पर्धेतील दुसरा यशस्वी संघ आहे. श्रीलंकेने 6 तर पाकिस्तानने 2 वेळा आशिया कप ट्रॉफी उंचावली आहे.

टी 20i आशिया कप स्पर्धेची तिसरी वेळ

यंदाची आशिया कप स्पर्धेची 17 वी वेळ आहे. आशिया कप स्पर्धेची सुरुवात ही वनडे फॉर्मेटने झाली. मात्र गेल्या काही दशकांमध्ये टी 20i क्रिकेटची क्रेझ वाढली. त्यामुळे 2016 साली पहिल्यांदा टी 20 आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर 2022 साली पुन्हा टी 20i आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यंदाची तिसरी वेळ आहे.

एकूण 8 संघ

आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात 8 संघ सहभागी होण्याची ही यंदाची पहिलीच वेळ आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 5 संघांनी थेट प्रवेश मिळवला. तर यूएई, ओमान आणि हाँगकाँग या 3 संघांनी पात्रता फेरीतून आशिया कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं.

नेपाळ टीम का नाही?

आशिया कप 2023 स्पर्धेत नेपाळ टीमने सहभाग घेतला होता. मात्र यंदा नेपाळ एसीसी प्रीमियर कप स्पर्धेत तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पराभूत झाली. हाँगकाँगने नेपाळला पराभूत करत आशिया कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. त्यामुळे नेपाळचं यंदा या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं.

टीम इंडिया-पाकिस्तान 3 सामने होणार?

टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे दोन्ही संघ एकदा आमनेसामने येणार, हे निश्चित आहे. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर समीकरणं जुळल्यास दोन्ही संघ सुपर 4 आणि अंतिम फेरीतही आमेनसामने येऊ शकतात.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ