AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 DC vs LSG : दिल्लीकडून पराभूत होताच कर्णधार ऋषभ पंतने असं फोडलं खापर, स्पष्टच सांगितलं की…

आयपीएल 2025 स्पर्धेतील 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 गडी राखून पराभूत केलं. या स्पर्धेत दिल्लीने लखनौ दुसऱ्यांदा पराभूत केलं. या विजयात केएल राहुलची खेळी महत्त्वाची ठरली. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आणि काय झालं ते सांगितलं.

IPL 2025 DC vs LSG : दिल्लीकडून पराभूत होताच कर्णधार ऋषभ पंतने असं फोडलं खापर, स्पष्टच सांगितलं की...
ऋषभ पंतImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 22, 2025 | 11:07 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 40 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा वरचष्मा दिसला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी अक्षर निर्णय योग्य ठरवला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 6 गडी गमवून 159 धावा केल्या आणि विजयासाठी 160 धावा दिल्या. या धावा दिल्ली कॅपिटल्सने 17.5 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केल्या. अभिषेक पोरेल आणि केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्स पराभवाच्या दरीत ढकळली गेली. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून दोन गुणांची कमाई केली आहे. या विजयासह गुणतालिकेत 12 गुण झाले असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी फक्त दोन विजय दूर आहे. म्हणजेच सहा पैकी दोन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. पण दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफचं गणित आणखी लांबलं आहे. लखनौला उर्वरित पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. या सामन्यातील पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आहे.

कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्हाला माहित होते की आम्हाला 20 धावा कमी पडल्या आहेत. टॉसने मोठी भूमिका बजावली. जो कोणी प्रथम गोलंदाजी करत असेल, त्याला विकेटमधून खूप मदत मिळते. आम्हाला फक्त मागे राहावे लागले, आम्ही ते टाळू शकलो नाही. लखनौमध्ये नेहमीच असे घडते, विकेट चांगली होती आणि फलंदाज फलंदाजी करतात. खेळ असाच चालतो आणि तुम्ही तक्रार करू शकत नाही. हो, टॉस मोठी भूमिका बजावत आहे, पण आम्ही सबबी शोधत नाहीत. हा एक विचार आहे.’

ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचं कारण काय? तेव्हा तो म्हणाला की, ‘आम्ही समदला अशा विकेटचा फायदा घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर मिलर आला आणि आम्ही विकेटमध्ये अडकलो. अखेर, या गोष्टी आहेत ज्या आम्हाला शोधून काढायच्या आहेत आणि पुढे जाऊन आमचे सर्वोत्तम संयोजन शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी सध्या काहीही विचार केलेला नाही, नुकताच सामना संपवला आहे, आपण पुन्हा संघटित होणार आहोत आणि पुन्हा लक्ष केंद्रित करणार आहोत. फक्त पुढचा सामना नव्याने खेळणार आहोत.’

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू