IPL 2026 Playoff Scenario: आता प्रत्येक मॅच निर्णायक, प्लेऑफसाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकावे लागणार?
IPL 2026 Playoff Scenario: आयपीएलच्या 19 व्या मोसमातील 50 सामने पूर्ण झाले आहेत. मात्र त्यानंतरही एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. तसेच एकही संघ बाहेरही झालेला नाही. त्यामुळे 10 संघांचं आव्हान कायम आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आता प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफसाठी चुरस वाढली आहे. आता एकही पराभव स्पर्धेतून बाहेर पडण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे 10 संघ आणखी ताकदीने मैदानात उतरणार आहेत. एकूण 10 पैकी 4 संघांचीच प्लेऑफमध्ये निवड होते. त्यामुळे या 4 जागांसाठी चुरस आहे. तसेच 50 सामन्यानंतरही कोणताही संघ अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेला नाही. त्यामुळे या 4 जागांसाठी आणखी खेचाखेची आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळते. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असतो. मात्र सध्या टॉप 4 साठी लढाई आहे. त्यामुळे प्रत्येक संघासाठी आता करो या मरो अशी स्थिती आहे. कारण एका पराभवामुळे समीकरण बदलणार आहे.
आयपीएल 2026 मधील 50 व्या सामना लखनौ सुपर जायंट्ससाठी करो या मरो असा होता. एलएसजीने एकाना स्टेडियममध्ये आरसीबीवर 9 धावांनी विजय मिळवून आपलं प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं. लखनौने 2 गुणांची कमाई करण्यासह आरसीबीला पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेण्यापासून रोखलं. या 50 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी आहे? तसेच कोणत्या संघाला किती सामने जिंकण्याची गरज आहे? हे जाणून घेऊयात.
पॉइंट्स टेबलमधील 10 संघांची स्थिती, हैदराबाद नंबर 1
आयपीएल 2026 स्पर्धेत 50 व्या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. हैदराबादने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. हैदराबादच्या खात्यात 14 गुण आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी गतउपविजेता पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानी आहेत. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सच्या नावावर 10 सामन्यांनंतर 13 गुण आहेत. गतविजेता आरसीबी तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत.
राजस्थान रॉयल्स चौथ्या आणि गुजरात टायटन्स पाचव्या स्थानी विराजमान आहे. राजस्थानने 10 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांची कमाई केली आहे. तर गुजरातनेही 10 पैकी 6 सामने जिंकलेत. मात्र नेट रनरेटचा फरक असल्याने राजस्थान चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्सने 10 सामन्यानंतर 10 गुण मिळवले आहेत. चेन्नई सहाव्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिट्ल्सला 10 पैकी 4 सामनेच जिंकता आले आहेत. दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. केकेआरच्या नावावर 9 सामन्यानंतर 7 गुण आहेत. केकेआर आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या खात्यात 10 सामन्यानंतर 6 गुण आहेत. तर लखनौ सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे. लखनौची मुंबईसारखीच स्थिती आहे. मात्र नेट रनरेट कमी असल्याने लखनौला 10 व्या स्थानी रहावं लागलं आहे.
10 संघ आणि प्लेऑफचं समीकरण
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद 19 व्या मोसमात सर्वाधिक सामने जिंकणारी टीम आहे. हैदराबादने 11 सामने खेळले आहेत. त्यामुळे हैदराबादला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित 3 पैकी एका सामन्यात जिंकावं लागेल. हैदराबाद 16 गुणांसह प्लेऑफमधील स्थान निश्चित करु शकते. ताज्या आकडेवारीनुसार, हैदराबादचा नेट रनरेट हा +0.737 असा आहे. हैदराबाद टॉप 2 मध्येही पोहचू शकते.
पंजाब किंग्स
पंजाब किंग्सचे 4 सामने शेष आहेत. पंजाबला प्लेऑफसाठी 4 पैकी किमान 2 सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र पंजाबला नेट रनरेटचा फायदा मिळू शकतो. मात्र स्वत:च्या जोरावर आणि सुरक्षितपणे पोहचण्यासाठी पंजाबचा 2 आणि जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न असेल. पंजाब या मोसमात पहिल्या 7 सामन्यांत एकूण 6 सामने जिंकून अजिंक्य होती. मात्र त्यानंतर पंजाबला सलग 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे पंजाब काहीशी अडचणीत आहे.
गतविजेता आरसीबी
आरसीबीने 10 सामने खेळले आहेत. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित 4 पैकी 2-3 सामने जिंकावे लागणार आहेत. आरसीबीचा नेट रनरेट हा +1.234 असा आहे जो इतर संघांपेक्षा जबरदस्त आहे. त्यामुळे आरसीबीला चांगल्या नेट रनरेटचा फायदा मिळू शकतो. आरसीबीचा टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असेल जेणेकरुन अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 1 अतिरिक्त संधी मिळेल.
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सने 10 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. राजस्थानच्या खात्यात 12 गुण आहेत. त्यामुळे राजस्थानला प्लेऑफसाठी 16 गुणांची गरज आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा +0.510 असा आहे. मात्र राजस्थानसाठी एक पराभव अडचण वाढवू शकतो. त्यामुळे राजस्थानला कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल.
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्सनेही 6 सामने जिंकले आहेत. गुजरातने 10 पैकी 4 सामने गमावले आहेत. मात्र गुजरातचा नेट रनरेट हा चिंतेचा विषय आहे. गुजरातचा नेट रनरेट हा -0.147 असा आहे. त्यामुळे गुजरातसमोर उर्वरित 4 पैकी 2 सामने जिंकण्यासह मोठ्या फरकाने प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचं आव्हान असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्सने 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सीएसकेला प्लेऑफसाठी उर्वरित 4 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. चेन्नईने 3 सामने जिंकले तरच त्यांचे 16 गुण होतील. चेन्नईचा नेट रनरेट हा +0.151 असा आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स
दिल्लीने 10 पैकी 6 सामने गमावलेत तर 4 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्लीने उर्वरित 4 सामने जिंकले तर त्यांचे 16 गुण होतील. मात्र ते इतकं सोपं नाही. तसेच एक पराभव दिल्लीचा बाजार उठवू शकतो. त्यामुळे दिल्लीची यंदा प्लेऑफ वारी मुकणार असलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.मात्र क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा -0.949 असा आहे.
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये कायम राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. केकेआरने 9 पैकी 3 सामने जिंकले आहेत. केकेआरला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. तर केकेआरचा 1 सामना पावसामुळे वाया गेला आहे. केकेआरच्या खात्यात 7 गुण आहेत. त्यामुळे केकेआरने उर्वरित 5 सामने जिंकले तर त्यांचे 17 गुण होतील. मात्र केकेआर उर्वरित आणि सलग 5 सामने जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केकेआरचा नेट रनरेट हा -0.539 असा आहे.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने 19 व्या मोसमात चाहत्यांची निराशा केली. मुंबईने 10 पैकी 7 सामने गमावलेत. तर पलटणला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. मुंबईने उर्वरित सर्व सामने जिंकले तरी 14 गुण होतील जे प्लेऑफसाठी पुरेसे नाहीत. मुंबईचा नेट रनरेट हा -0.649 असा आहे.
लखनौ सुपर जायंट्स
लखनौने गुरुवारी आरसीबीला पराभूत करुन आपलं आव्हान कायम राखलंय. मात्र लखनौला प्लेऑफची संधी ही नाहीच्या बरोबर आहे. लखनौने मुंबईप्रमाणे 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर लखनौचा 7 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. लखनौने उर्वरित सामने जिंकले तरी त्यांचे 14 गुण होतील. लखनौचा नेट रनरेट हा -0.934 असा आहे.
