AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआयला डोकेदुखी! वेळापत्रकात बदल होणार?

IPL Schedule 2026 : आसाममधील विधानसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या 19 व्या मोसमातील निवडक सामन्यांच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआय याबाबत काय भूमिका घेते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL 2026 : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआयला डोकेदुखी! वेळापत्रकात बदल होणार?
Rohit Sharma Hardik Pandya Team IndiaImage Credit source: AFP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 15, 2026 | 9:55 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना 8 मार्च रोजी पार पडला. न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली. टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची सलग दुसरी आणि एकूण तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. बीसीसीआयकडून 11 मार्च रोजी आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकूण 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने फक्त पहिल्या टप्प्यात 20 सामन्यांचंच वेळापत्रक जाहीर केलं.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 28 मार्चपासून 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. तर पहिल्या टप्प्यात 16 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहे. मात्र उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक केव्हा जाहीर केलं जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. आता रविवारी 15 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 19 व्या मोसमातील उर्वरित वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. मात्र निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने बीसीसीआयच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने बीसीसीआयला 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

निवडणुकीमुळे आसाममधील सामन्यावर परिणाम!

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 9 एप्रिलला आसामध्ये मतदान होणार आहे. आसामध्ये एकूण 126 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात 7 एप्रिल रोजी आसामामधील गुवाहाटीत सामना नियोजित आहे.

एकूण 10 शहरांमधील स्टेडियममध्ये आयपीएलच्या 19 व्या मोसमातील सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये आसाममधील बारसपारा क्रिकेट स्टेडियमचाही समावेश आहे. राजस्थान रॉयल्सचं हे दुसरं होम ग्राउंड आहे. या स्टेडियममध्ये पहिल्या टप्प्यातील 3 सामने नियोजित आहे. हे तिन्ही सामने संध्याकाळी होणार आहेत.

3 सामन्यांचं वेळापत्रक

पहिला सामना, 30 मार्च, राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

दुसरा सामना, 7 एप्रिल, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

तिसरा सामना, 10 एप्रिल, राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी

मतदान 9 एप्रिलला होणार म्हटल्यावर 7 एप्रिलपासूनच मतदानाचं वातावरण तयार होतं. मतदानाच्या काही तासांआधी प्रचाराच्या तोफा थंडावतात. तसेच निवडणुकीनंतरचा दुसरा आणि मतमोजणीचा दिवसही सुरक्षेचा दृष्टीने महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असतो. त्यामुळे आता बीसीसीआयकडून 19 व्या मोसमातील 7 आणि 10 एप्रिलला होणाऱ्या सामन्यांबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल