AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, SRH vs LSG: ऋषभ पंतची विजयी अर्धशतकी खेळी, सामना संपल्यानंतर सरळ म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सनरायझर्स हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केलं. या विजयात कर्णधार ऋषभ पंतची खेळी महत्त्वाची ठरली. या सामन्यानंतर ऋषभ पंतने आपलं मनोगत व्यक्त केलं.

IPL 2026, SRH vs LSG: ऋषभ पंतची विजयी अर्धशतकी खेळी, सामना संपल्यानंतर सरळ म्हणाला...
IPL 2026, SRH vs LSG: ऋषभ पंतची विजयी अर्धशतकी खेळी, सामना संपल्यानंतर सरळ म्हणाला...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 05, 2026 | 8:05 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्स या स्पर्धेतील दुसरा सामना खेळली. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाले. पण दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी निवडली. तसेच सनरायझर्स हैदराबादला 156 धावांवर रोखलं. विजयासाठी दिलेल्या 157 धावांचं आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.5 षटकात पूर्ण केलं. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सात सामन्यांमधील लखनौ सुपर जायंट्सचा हा पाचवा विजय आहे. यात चार सामन्यांपैकी हैदराबादमध्ये तीन विजय मिळवले आहेत. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना शानदार अर्धशतक झळकावले. या सामन्यात सलामी ऐवजी पंत तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी 9 धावांची गरज होती. तेव्हा ऋषभ पंतने जयदेव उनाडकटच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारून लखनौचा विजय सोपा. तसेच पाचव्या चेंडूवर आणखी एक चौकार मारला आणि विजय मिळवला.

काय म्हणाला ऋषभ पंत?

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘मला वाटतं की गोलंदाजांचं कौतुक करायलाच हवं, कारण तेच लोक तुम्हाला सामन्यासाठी तयार करतात, विशेषतः जेव्हा तुम्ही प्रथम गोलंदाजी करता. मला वाटतं शमी भाई, आवेश, राठी, मला वाटतं प्रत्येकाने खूप चांगलं योगदान दिलं आहे, विशेषतः आज आलेल्या सिद्धार्थने. तुम्हाला माहिती आहे, आम्ही मैदानावर ठरवलं होतं की तो सामना जिंकून देईल आणि त्याने आमच्यासाठी खूप चांगलं काम केलं.

काय म्हणाला इशान किशन?

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन म्हणाला की, ‘ मला वाटतं की गोलंदाजांनी आज खूपच चांगलं काम केलं. त्यांनी योजनेनुसार योग्य ठिकाणी गोलंदाजी केली, तसेच क्षेत्ररक्षकांनीही पूर्ण प्रयत्न केल्याबद्दल त्यांना श्रेय द्यायला हवं. पण तुम्हाला माहिती आहे, अशा स्पर्धांमध्ये एक-दोन चौकार मारून सामना हातातून निसटू शकतो. त्यामुळे हो, पण ज्या प्रकारे आम्ही हा सामना लढलो, त्याचा मला आनंद आहे.’

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल