AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction: महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंवर कोलकात्याची नजर, महालिलावात पर्स रिकामी करण्यास तयार?

आयपीएलच्या गेल्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचलेल्या कोलकात्याच्या संघाने जेतेपदासाठीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभव स्वीकारला होता, पण यावेळी त्यांना संघात कोणतीही कमतरता नको आहे आणि त्यासाठी त्यांना महा लिलावात उत्तमोत्तम खेळाडू विकत घ्यावे लागतील जे त्यांना चॅम्पियन बनवतील.

IPL 2022 Auction: महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंवर कोलकात्याची नजर, महालिलावात पर्स रिकामी करण्यास तयार?
Kolkata Knight Riders TeamImage Credit source: social
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 08, 2022 | 5:07 PM
Share

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) चा महालिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व 10 फ्रँचायझींचे डोळे आता बंगळुरुकडे लागले आहेत, जिथे 590 खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. 2 वेळा आयपीएल चॅम्पियन संघ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) या महालिलावासाठी जोरदार तयारी केली आहे. एका अंदाजानुसार कोलकाता नाईट रायडर्स हा संघ महाराष्ट्राच्या 2 स्टार खेळाडूंना खरेदी करण्यासाठी अग्रही असेल. कारण ते खेळाडू त्यांच्या संघासाठी परफेक्ट असतील. आपल्या संघाला पूर्वीप्रमाणे मजबूत संघ म्हणून मैदानात उतरवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचे संघमालक अनेक तगड्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतील.

आयपीएलच्या गेल्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचलेल्या कोलकात्याच्या संघाने जेतेपदासाठीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभव स्वीकारला होता, पण यावेळी त्यांना संघात कोणतीही कमतरता नको आहे आणि त्यासाठी त्यांना महा लिलावात उत्तमोत्तम खेळाडू विकत घ्यावे लागतील जे त्यांना चॅम्पियन बनवतील. कोलकाता नाईट रायडर्सने 4 खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे जे त्यांच्या संघाचा आधारस्तंभ आहेत. संघाने अष्टपैलू आंद्रे रसेल, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर यांना रिटेन केले आहे.

याव्यतिरिक्त संघमालक अजून तीन-चार मॅचविनर खेळाडू संघात यावेत, यासाठी प्रयत्नशील असतील. त्यातही प्रामुख्याने त्यांना दोन असे खेळाडू हवे आहेत, जे त्यांच्यासाठी सामने जिंकून देतील. तसेच केकेआरला एक चांगला कर्णधारदेखील हवा आहे. लिलावाच्या वेळी या गोष्टींचा विचार करुनच केकेआरचे संघमालक खेळाडूंवर बोली लावतील. त्यामुळे केकेआरची नजरा महाराष्ट्रातल्या दोन खेळाडूंवर असेल. ते खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर आणि राहुल त्रिपाठी. देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस मुंबईचा शिलेदार आहे. तर राहुल त्रिपाठी महाराष्ट्राचा उपकर्णधार आहे. या दोन खेळाडूंवर केकेआरची नजर असेल.

कोलकात्याला श्रेयससारख्या खेळाडूची गरज

श्रेयस अय्यर हे नाव महा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सच्या रडारवर नक्कीच असेल. उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे, गेल्या वर्षी त्याच्या जागी पंतकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली होती. तसेच, अय्यरला दिल्लीने रिटेन केले नाही. तसेच लखनौ-अहमदाबाद या नवीन संघांनीही त्याला कर्णधार बनवले नाही. या सर्व गोष्टी कोलकाताच्या बाजूने गेल्या आहेत कारण हा संघ कर्णधाराच्या शोधात आहे. गेल्या मोसमात कोलकाताने ऑईन मॉर्गनला कर्णधार बनवले होते. मॉर्गन फॉर्मात नसल्यामुळे कोलकात्याच्या संघाला मोठा फटका सहन करावा लागला. तसेच यावेळी कोलकात्याला कोणत्याही परिस्थितीत भारतीय खेळाडूला कर्णधार बनवायचे आहे आणि त्यांना श्रेयस अय्यरपेक्षा चांगला पर्याय मिळणार नाही. अय्यरने आयपीएलमध्ये 87 सामन्यांत 31.66 च्या सरासरीने 2375 धावा केल्या आहेत. अय्यर हा क्रमांक 3 आणि क्रमांक 4 वर सर्वोत्तम फलंदाज आहे, ज्याच्याकडे KKR साठी सामने जिंकण्याची ताकद आहे. तसेच 2020 च्या आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती.

मधल्या फळीत राहुल त्रिपाठीसारखा मॅचविनर हवा

कोलकाता फ्रँचायझी त्यांच्या एका खेळाडूला संघात परत घेण्यास उत्सूक आहे. आम्ही त्यांच्या मधल्या फळीतला खेळाडू राहुल त्रिपाठीबद्दल बोलत आहोत. राहुलने गेल्या मोसमात कोलकात्यासाठी 28 पेक्षा जास्त सरासरीने 397 धावा फटकावल्या होत्या. राहुल त्रिपाठी हा कोलकात्यासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने अनेकदा कोलकात्यासाठी मॅचविनिंग खेळी साकारल्या आहेत. कोलकात्याचा संघमालक शाहरुख खाननेदेखील अनेकदा राहुलचं कौतुक केलं आहे. त्यामुळे केकेआर पुन्हा एकदा राहुल त्रिपाठीचा संघात समावेश करू शकतो, असे मानले जात आहे.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली