AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS NZ : न्यूझीलंडला नमवलं, मात्र पुढील दौऱ्यात लागणार टीम इंडियाची खरी कसोटी!

भारतीय संघाचा पुढील दौरा दक्षिण आफ्रिकेचा आहे. जिथे त्यांनी एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची ही पहिलीच मोठी परीक्षा असेल, पण यात ते कसे पास होणार, हा मोठा प्रश्न आहे.

IND VS NZ : न्यूझीलंडला नमवलं, मात्र पुढील दौऱ्यात लागणार टीम इंडियाची खरी कसोटी!
राहुल द्रविड
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 06, 2021 | 8:41 PM
Share

मुंबई : कसोटीत भारताने न्यूझीलंड(New Zealand)चा 372 धावांनी एकतर्फी पराभव केला. टीम इंडिया(Team India)ला चौथ्या दिवशी 5 विकेट्सची गरज होती. मात्र टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या तासातच नमवले. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0ने जिंकली. टीम इंडियाने मालिका जिंकली, मात्र असे असतानाही अडचणी कमी झालेल्या नाहीत. भारतीय संघाचा पुढील दौरा दक्षिण आफ्रिकेचा आहे. जिथे त्यांनी एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची ही पहिलीच मोठी परीक्षा असेल, पण यात ते कसे पास होणार, हा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या अडचणीची 5 मोठी कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

  1. विराट कोहली (Virat Kohli) फॉर्मात नाही – टीम इंडियाने मुंबई कसोटीत मोठा विजय नोंदवला. पण कर्णधार विराट कोहली अजूनही फॉर्मात नाही. गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहलीने शतकही केले नाही आणि मुंबई कसोटीलाही तो मुकला. विराट कोहलीला पहिल्या डावात खातेही उघडता आले नव्हते आणि दुसऱ्या डावात तो किरकोळ शॉट खेळून 36 धावांवर बाद झाला. विराट कोहली, राहुल द्रविड आणि टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आउट ऑफ फॉर्म फलंदाज म्हणून जाणे अजिबात योग्य नाही.
  2. अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane)च्या बॅटवर धावांचे ग्रहण सुरूच आहे. रहाणे कानपूर कसोटीत काहीही करू शकला नाही आणि मुंबईतही त्याला संधी मिळाली नाही. रहाणेला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. पण कुठेतरी या खेळाडूची कारकीर्द आता अडचणीत आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, रहाणेसाठी दक्षिण आफ्रिकेत खेळणे खूप कठीण आहे. आता टीम इंडियाला श्रेयस अय्यर(Shreyas Iyer)च्या रूपाने त्याचा पर्यायही मिळाला आहे.
  3. चेतेश्वर पुजारा(Cheteshwar Pujara)लाही बरेच दिवस शतक झळकावता आलेले नाही आणि त्याची बॅट शांत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही पुजारा अपयशी ठरला होता. त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. 3 डावात पुजाराने 23.75च्या सरासरीने केवळ 95 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर पुजारावर विश्वास ठेवणे थोडे कठीण झाले आहे. टीम इंडियानेही पुजाराचा पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
  4. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ईशांत शर्मा(Ishant Sharma)ही काही करू शकला नाही. ईशांत शर्माला कानपूर कसोटीत एकही विकेट मिळाली नाही आणि त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मुंबई कसोटीत संधी मिळाली नाही. ईशांत शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूसाठी फॉर्ममध्ये नसणे ही द्रविडसाठी मोठी समस्या आहे. दक्षिण आफ्रिकेची मालिका जिंकण्यासाठी अनुभवाची गरज असेल पण आता ईशांतची निवडही कठीण वाटत आहे.
  5. शुबमन गिल (Shubhman Gill) हा टीम इंडियाचा भविष्यकाळ आहे, असे म्हटले जाते, पण तो ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, ते पाहता असे सांगणेही जरा घाईचे वाटते. गिलने कसोटी मालिकेत 36च्या सरासरीने 144 धावा केल्या पण तो त्याच्या भूतकाळातील चुकांमधून धडा घ्यायला तयार नाही. गिल या स्विंग बॉल्सवर अजूनही विकेट गमावत आहे आणि सेट होऊनही अचानक आऊट होत आहे. टीम इंडिया गिलकडे मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पाहत आहे, पण हे असेच सुरू राहिले तर दक्षिण आफ्रिकेत संघाच्या विजयाची शाश्वती देता येणार नाही.

रहाणेच्या फॉर्मबाबत विराटचं थेट उत्तर; ‘मी त्याला जज करु शकत नाही, त्याला परिस्थितीची जाणीव’

कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सत्कार

WTC Points Table : शेजाऱ्यांमुळे भारताचं नुकसान, NZ ला हरवूनही गुणतालिकेत पहिलं स्थान नाहीच

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली