AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबीविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच ऋषभ पंतने नांगी टाकली, थेट पुढच्या हंगामाचं सांगून टाकलं

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची स्थिती खूपच वाईट आहे. खरं तर लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त काही सामन्यांची औपचारिकता आहे. असं असताना कर्णधार ऋषभ पंतनेही नांगी टाकून दिली आहे.

आरसीबीविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच ऋषभ पंतने नांगी टाकली, थेट पुढच्या हंगामाचं सांगून टाकलं
आरसीबीविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच ऋषभ पंतने नांगी टाकलीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 07, 2026 | 9:20 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 50वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात दोन पावसामुळे खंड पडला. त्यामुळे हा सामना पूर्ण होईल की नाही याबाबतही साशंकता आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतरच लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. नाणेफेक गमावताच ऋषभ पंतने या स्पर्धेतील संघाचं आव्हान संपुष्टात आल्याचं मान्य केलं. ऋषभ पंतने सांगितलं की, या पर्वात ज्या चुका झाल्या त्या दुरूस्त करून पुढच्या पर्वात चांगली कामगिरी करू. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यापैकी सात सामने गमावले आहे. त्यामुळे गुणतालिकेत 4 गुणांसह तळाशी आहे.

काय म्हणाला ऋषभ पंत?

आयपीएल सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर समालोचकांनी कर्णधार ऋषभ पंतशी चर्चा केली. यावेळी समालोचकाने संघात सध्या काय चर्चा होत आहे? असा प्रश्न विचारलं. तेव्हा ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्हाला माहिती आहे की आम्ही टॉपचे खेळाडू आहोत, पण कधी कधी काही गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. क्रिकेट असंच असतं. बहुतांश याच गोष्टी होतात की आम्हाला गोष्टी स्पष्ट दिसत नाही. बॅटिंग ऑर्डरमध्ये काही बदल झाले आहेत आणि आम्ही येथे धडा घेऊन पुढच्या पर्वात चांगली कामगिरी करू. टी20 क्रिकेटमध्ये एक स्थिर वातावरण असणं आवश्यक आहे. त्यासोब बदलही आवश्यक असतो.’

लखनौ सुपर जायंट्सची या पर्वातील सुरूवात पराभवाने झाली. दिल्ली कॅपिटल्सने सहा विकेटने पराभूत केलं होतं. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने सलग दोन सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे संघाचं कमबॅक झालं असं वाटलं होतं. पण त्यानंतर पराभवाची मालिका सुरू झाली. सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. गुजरात टायटन्स, आरसीबी, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, कोलकता नाईट रायडर्स आणि तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्सनेही पराभूत केलं. त्यात ऋषभ पंतची कामगिरीही सुमार राहिली. या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू असूनही 9 सामन्यात फक्त 204 धावा केल्या आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 130 पेक्षा कमी आहे.

Follow Us
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा