AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबीने तीन महिन्यानंतर ‘त्या’ घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेर

आरसीबीने 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 18 व्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. पण जेतेपदाच्या दुसऱ्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं. विजयी जल्लोष कार्यक्रमात अनर्थ घडला आणि क्रीडाप्रेमींना जीव गमवावा लागला. आता यावर तीन महिन्यांनी आरसीबीने मौन सोडलं आहे.

आरसीबीने तीन महिन्यानंतर 'त्या' घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेर
आरसीबीने तीन महिन्यानंतर 'त्या' घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेरImage Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2025 | 6:41 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासूनचं जेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. त्यामुळे इतक्या वर्षानंतर आनंदाला उधाण आलं होतं. चाहतेही आपल्या संघाच्या विजयाच्या जल्लोष भारावून गेले होते. 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण दुसर्‍या दिवशी या आनंदावर विरजन पडलं. कारण 4 जूनच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 11 लोकांना जीव गमवावा लागला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी गेल्या तीन महिन्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. पण आरसीबी फ्रेंचायझीने मौन बाळगलं होतं. कोर्टाने देखील या प्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. असं असताना तीन महिन्यानंतर आरसीबीने भावनिक पोस्ट केली आहे. यात त्यांनी लिहिलं की, 3 जूनला आम्ही खूप खुश होतो, पण 4 जूनमुळे सगळं काही बदललं. विजयानंतर आरसीबीचा संघ 4 जूनला बंगळुरु शहरात परतला होता. यावेळी एम चिन्नस्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडचं आयोजन केलं होतं. पण रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आमचं शांत असणं दु:ख होतं. ही जागा कधी एनर्जी, आठवणी आणि त्या आनंददायी क्षणांनी भरलेली होती. त्याचा तुम्ही सर्वात जास्त आनंद घेतला. पण 4 जूनच्या प्रकरणामुळे सर्व काही बदललं. त्या दिवसानंतर शांततेने आपली जागा बनवली होती. या शांततेत आम्ही शोक करत होतो. ऐकत होतो आणि शिकत होतो. हळूहळी आम्ही एका प्रतिक्रियेपेक्षा काहीतरी बनू लागलो. आता ती अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो. ‘

‘आरसीबी केअर्स अस्तित्वात आले. त्याचा जन्म आदर देण्याबरोबरच उपचार करण्याच्या आणि आमच्या चाहत्यांसह उभे राहण्याच्या उद्देशाने झाला. आम्ही आता आमच्या चाहत्यांसह उत्सव साजरा करण्याऐवजी काळजी घेऊन पुढे जात आहोत.आरसीबी केअर्स कर्नाटकचा अभिमान बनणार आहे आणि आम्ही नेहमीच असेच करत राहू.’, असंही आरसीबीने पुढे लिहिलं आहे. या अजून डिटेल्स लवकरच देऊ असं सांगितलं आहे. दरम्यान, 4 जूनच्या चेंगराचेंगरीनंतर आरसीबीने प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत केली आहे.

प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू.
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया.
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट.
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश.