AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशारा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत या दोन्ही संघांचा सामना होणार हे निश्चित झालं होतं. 15 फेब्रुवारीला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने माज दाखवण्यास सुरुवात केली आहे.

IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशारा
IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशाराImage Credit source: Getty Images
| Updated on: Jan 09, 2026 | 4:47 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद गेल्या काही वर्षात टोकाला गेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय भारतीय संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देश फक्त मल्टीनॅशनल स्पर्धेतच आमनेसामने येतात. इतकंच काय तर तटस्थ ठिकाणी या दोन्ही संघांचा सामना होतो. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे या दोन्ही संघात सामना होणार हे स्पष्टच होतं. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर 15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान हे संघ श्रीलंकेत हे दोन्ही संघ भिडणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या प्रेमादासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला एका महिन्याचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानकडून वाकयुद्ध सुरू झालं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यापूर्वीच पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बेताल वक्तव्य करत टीम इंडियाला इशारा देत आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर भारत पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आशिया कप स्पर्धेपासून भारतीय संघाने नो हँडशेक पॉलिसी स्वीकारली होती. आताही तसंच असेल यात काही शंका नाही. त्यामुळे या सामन्यापूर्वीही वादाला फोडणी मिळणार यात काही शंका नाही. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी म्हणाला की, “सीमेपलीकडून आलेल्यांनी खेळ भावनेचे उल्लंघन केले आहे. पण आमचे काम क्रिकेट खेळणे आहे आणि आमचे लक्ष त्यावर आहे. आम्ही त्यांना मैदानावर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करू.” सध्या तरी भारताने या विषयावर मौन बाळगले आहे.

भारताने आशिया कप स्पर्धेत सलग तीन वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. महिला क्रिकेटपटूंनीही वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला लोळवलं. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंतचा टी20 स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारताचं पारडं जड आहे. भारत पाकिस्तान हे संघ 16वेळा आमनेसामने आले. यात पाकिस्तानला फक्त तीन वेळा विजय मिळाला आहे. तर भारताने 12 वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 8 वेळा आमनेसामने आले आणि भारताने 7-1 असा विजय मिळला आहे.2022 पासून पाकिस्तानने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. तर भारताने सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र