AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs CAN: 1 ओपनर-1 बॉलर, टीम इंडियाचे 2 खेळाडू माघारी येणार! नक्की कारण काय?

Team India: टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू हे माघारी परतणार असल्याचं म्हटलं जात आहे.

IND vs CAN: 1 ओपनर-1 बॉलर, टीम इंडियाचे 2 खेळाडू माघारी येणार! नक्की कारण काय?
team india Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 14, 2024 | 5:49 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचे काही सामने बाकी आहेत. एकूण 4 ग्रुपमधील 2 अव्वल संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होणार आहेत. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएला पराभूत करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडिया आता साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना हा कॅनडा विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध कॅनडा हा सामना शनिवारी 15 जून रोजी होणार आहे. हा सामना फ्लोरिडा येथे होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया विंडिजला रवाना होईल.

टीम इंडिया विंडिजला रवाना होण्याआधी मॅनजमेंटने मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. टीम मॅनेजमेंटने संघातील 2 खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपसाठीच्या मुख्य संघात एकूण 15 आणि राखीव म्हणून 4 खेळाडूंचा समावेश आहे. या राखीव पैकी 2 खेळाडूंना मायदेशी पाठवण्यात येणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामन्यानंतर सलामी फलंदाज शुबम गिल आणि वेगवान गोलंदाज आवेश खान या दोघे भारतात परतणार आहेत. आवेश आणि शुबमन दोघेही सुपर 8 राउंडसाठी टीम इंडियासोबत नसतील. तर रिंकू सिंह आणि खलील अहमद हे दोघेही राखीव खेळाडू आहेत. मात्र हे दोघे टीम इंडियासोबत असतील.

ऐन क्षणी मुख्य संघातील खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यास त्याच्या जागी राखीव खेळाडूचा समावेश केला जातो. मात्र साखळी फेरीत आतापर्यंत टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दुखापत झालेली नाही. तसेच मुख्य संघात विकेटकीपर आणि ओपनर या जागांसाठी 2 खेळाडू आहेत. त्यामुळे सुपर 8 मध्ये अतिरिक्त राखीव खेळाडूंची गरज नसणार आहे. त्यामुळे आवेश आणि शुबमन या दोघांना पाठवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

कॅनडा क्रिकेट टीम: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉनसन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), डाइलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किरटन, प्रगत सिंह, रविंद्रपाल सिंह आणि रेयानखान पठान.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.