AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली दखल

आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉल्वार्डने झुंजार खेळी केली. पण संघाला पराभवातून वाचवू शकली नाही. पण तिने स्पर्धेत केलेल्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली दखल
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली खेळीची दखलImage Credit source: PTI
| Updated on: Nov 12, 2025 | 7:25 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने विजयीसाठी 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान गाठताना सर्व गडी गमवले आणि 52 धावा कमी पडल्या. अंतिम फेरीत एकीकडे धडाधड विकेट पडत असताना दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्ड झुंज देत होती. मात्र तिची विकेट पडली आणि विजयाच्या आशा मावळल्या. लॉराने अंतिम फेरीतच नाही तर संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या आठ सामन्यात तिने 67.14 च्या सरासरीने 97.91 च्या स्ट्राईक रेटने 470 धावा केल्या. यात उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक ठोकलं. लॉराच्या या खेळीमुळे क्रीडाप्रेमीही तिचं कौतुक करत आहेत. आता तिच्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली असून तिला खास भेट दिली आहे. लॉरा वॉल्वार्डला ऑक्टोबर 2025 स्पर्धेचा वुमन्स प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करून गौरव केला आहे.

आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाल्यानंतर लॉरा वॉल्वार्डने आनंद व्यक्त केला आहे. लॉराने सांगितलं की, “भारतात झालेल्या वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत संघाच्या कामगिरीनंतर हा पुरस्कार जिंकणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट सामने आणि उत्कृष्ट कामगिरी झाली. स्पर्धा जिंकणे ही मोठी गोष्ट असली तरी, आम्हाला आमच्या विजयाचा आणि आम्ही दाखवलेल्या अढळ भावनेचा अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की आयसीसी वर्ल्डकप विजेतेपद आमच्या आवाक्यात आहे. मी सर्वांच्या पाठिंब्याची प्रशंसा करते आणि मैदानावर तुम्हाला अभिमानित करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.”

भारत आणि दक्षिण अफ्रिका अंतिम सामना

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या आणि विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 246 धावांवर बाद झाला. या सामन्यात भारताने 52 धावांनी विजय मिळवला. आता पुढच्या वर्षी टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवतं याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप