AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: सस्पेंस संपला! विराट कोहली 2027 विश्वचषक खेळणार की नाही? कोचचे थेट उत्तर

Virat Kohli ODI World Cup 2027: विराट कोहली 2027 मध्ये एकदिवशीय विश्वचषकात खेळणार की नाही, याविषयी चाहत्यांमध्ये आणि क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. आता या चर्चांवर पडदा पडण्याची शक्यता आहे. विराटचा बालमित्र आणि कोच राजकुमार शर्मा यांनी याविषयीचे मोठे भाकीत केले आहे.

Virat Kohli: सस्पेंस संपला! विराट कोहली 2027 विश्वचषक खेळणार की नाही? कोचचे थेट उत्तर
विराट कोहली
| Updated on: Dec 26, 2025 | 11:01 AM
Share

Virat Kohli ODI World Cup 2027: बुधवारी ,24 डिसेंबर रोजी विराट कोहलीने विजय हजारे करंडकात तुफान आणले. आंध्रप्रदेश संघाविरोधातील सामन्यात त्याने 131 धावांची खेळी खेळली. त्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीने 299 धावांचे लक्ष्य अवघ्या 38 व्या षटकातच गाठले. विराट हा गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात वनडे सीरीजमध्ये 2 शतक आणि एक अर्धशतकी खेळी खेळली.

जबरदस्त कामगिरी बजावत असतानाही विराटला काही वेळा विश्रांती देण्यात आल्याने वाद उफाळला होता. तर आता तो 2027 मधील ODI World Cup खेळणार की नाही, असा सवाल विचारल्या जात आहे. त्यावर विराटचा लहानपणीचा मित्र आणि कोच राजकुमार शर्मा याने ANI शी बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे. कोच राजकुमार यांच्या मते विराट हा 2027 मधील विश्वचषकासाठी एकदम तंदुरुस्त आहे. तो खेळण्यासाठी तयार आहे.

विराट कोहली खेळेल 2027 वर्ल्ड कप!

वृत्त संस्था ANI शी बोलताना राजकुमार शर्मा यांनी सांगितले की, विराट हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. गेल्या काही सामन्यात त्याने सातत्य टिकवून ठेवले आहे. त्याने दीर्घकाळानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये उतरत चमकदार कामगिरी बजावली. भारतीय संघात सातत्यपूर्ण जोरदार कामगिरी बजावत त्याने त्याचे स्थान बळकट केले आहे. तो विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहे.

दिल्लीसाठी त्याने 131 धावांची तुफान खेळी खेळली. कोहलीने लिस्ट-A मध्ये त्याच्या जीवनातील 58 वे शतक ठोकले. दिल्लीसाठी लिस्ट-A क्रिकेटमध्ये त्याचे हे 5 वे शतक आहे. त्याने या यादीत 16,000 धावा पूर्ण केल्या आहेत.लिस्ट-A क्रिकेटमध्ये विराटने 330 डावांमध्ये 16,130 धावा केल्या. विराट कोहली हा विजय हजारे ट्रॉफीमध्ये आज 26 डिसेंबरमध्ये खेळेल. दिल्लीचा सामना आज गुजरातमध्ये होणार आहे. जयपुर येथील सवाई मान सिंह स्टेडियमवर हा सामना होत आहे. आज विराट पुन्हा शतकी खेळी खेळणार का याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. तिकडे रोहित शर्मा ही जबरदस्त कामगिरी करत आहे. वैभव सूर्यवंशीची बॅट सुद्धा तळपली आहे. तर जुने खेळाडू सुद्धा स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलेच घाम गाळत असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?