AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Warm up Match: न्यूझीलंड विरुद्ध मॅच रद्द, आता भारताचा सामना थेट पाकिस्तानशी

IND vs NZ Warm up Match: आज टीम इंडियाकडे तयारीचा आढावा घेण्याची शेवटची संधी होती, पण....

IND vs NZ Warm up Match: न्यूझीलंड विरुद्ध मॅच रद्द, आता भारताचा सामना थेट पाकिस्तानशी
team indiaImage Credit source: BCCI
| Updated on: Oct 19, 2022 | 2:52 PM
Share

ब्रिस्बेन: टीम इंडिया आज न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) दुसरा सराव सामना खेळणार होती. पण हा सामना रद्द झाला आहे. ब्रिस्बेनमध्ये ही मॅच होणार होती. पावसामुळे हा सामना रद्द झाला आहे. दोन्ही टीम्स सुपर 12 मध्ये आधीच पोहोचल्या आहेत. टीम इंडिया याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना खेळली. या मॅचमध्ये टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला होता.

त्यामुळे आयोजकांनी सामना रद्द केला

बुधवारी ब्रिस्बेनमध्ये पाऊस कोसळत होता. भारत आणि न्यूझीलंडची टीम मॅचसाठी गाबा स्टेडिमयमध्ये दाखल झाली होती. आज पाऊस थांबलाच नाही. त्यामुळे आयोजकांना अखेर सामना रद्द करावा लागला.

कट ऑफ टाइम किती होता?

मॅचचा कट ऑफ टाइम संध्याकाळी 4.16 मिनिट होता. पाऊस थांबला असता, तर या वेळेपर्यंत वाट पाहता आली असती. पण सतत पाऊस कोसळत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानचा सामनाही रद्द

या सामन्याआधी गाबामध्येच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सराव सामना होणार होता. पण पावसामुळे हा सामना सुद्धा रद्द झाला. ब्रिस्बेनच्या एलन बॉर्डर मैदानात बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणारा सराव सामना पावसामुळे रद्द झाला.

आज शेवटची संधी होती

आता टीम इंडियाचा पुढचा सामना थेट पाकिस्तान विरुद्ध होईल. टी 20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची ही पहिली मॅच असेल. मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात लास्ट ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने कमाल केली होती. आज टीम इंडियाकडे तयारीचा आढावा घेण्याची शेवटची संधी होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.